शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

By admin | Updated: May 16, 2017 23:43 IST

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी गंगापूर धरण आणि गोदापात्रातील गाळ काढण्याची सूचना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गाळ काढल्यास जलसाठवण क्षमता वाढून पुराचा धोका टळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या वर्षी ३ आॅगस्टला गंगापूर धरणातून गोदापात्रात ४२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु त्याचवेळी अहल्यादेवी होळकर पुलाखाली ७५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजेच ३२ हजार ५०० क्यूसेक अतिरिक्त पाणी गोदापात्रात होते. त्यात भर म्हणून गटारींचे पाणी मिसळत होते. अहल्यादेवी होळकर पुलाच्या पुढेदेखील पुराची स्थिती गंभीर होते. सध्या शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल, तसेच पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आनंदवली ते होळकर पुलाखालीदेखील गाळ साचला असून, तो हटविल्यास साठवण क्षमता वाढण्याबरोबरच ग्राऊंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळेल, असे देवांग जानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते आणि त्यामुळे नदीला पूर येतो. हे टाळण्यासाठी पावसाळी गटारींचे पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरवले तर भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होईल, त्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती आणि मविप्र वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते विनामोबदला सहकार्य करण्यास तयार असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.