शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

By admin | Updated: May 16, 2017 23:43 IST

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी गंगापूर धरण आणि गोदापात्रातील गाळ काढण्याची सूचना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गाळ काढल्यास जलसाठवण क्षमता वाढून पुराचा धोका टळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या वर्षी ३ आॅगस्टला गंगापूर धरणातून गोदापात्रात ४२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु त्याचवेळी अहल्यादेवी होळकर पुलाखाली ७५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजेच ३२ हजार ५०० क्यूसेक अतिरिक्त पाणी गोदापात्रात होते. त्यात भर म्हणून गटारींचे पाणी मिसळत होते. अहल्यादेवी होळकर पुलाच्या पुढेदेखील पुराची स्थिती गंभीर होते. सध्या शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल, तसेच पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आनंदवली ते होळकर पुलाखालीदेखील गाळ साचला असून, तो हटविल्यास साठवण क्षमता वाढण्याबरोबरच ग्राऊंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळेल, असे देवांग जानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते आणि त्यामुळे नदीला पूर येतो. हे टाळण्यासाठी पावसाळी गटारींचे पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरवले तर भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होईल, त्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती आणि मविप्र वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते विनामोबदला सहकार्य करण्यास तयार असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.