शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

By admin | Updated: May 16, 2017 23:43 IST

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी गंगापूर धरण आणि गोदापात्रातील गाळ काढण्याची सूचना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गाळ काढल्यास जलसाठवण क्षमता वाढून पुराचा धोका टळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या वर्षी ३ आॅगस्टला गंगापूर धरणातून गोदापात्रात ४२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु त्याचवेळी अहल्यादेवी होळकर पुलाखाली ७५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजेच ३२ हजार ५०० क्यूसेक अतिरिक्त पाणी गोदापात्रात होते. त्यात भर म्हणून गटारींचे पाणी मिसळत होते. अहल्यादेवी होळकर पुलाच्या पुढेदेखील पुराची स्थिती गंभीर होते. सध्या शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल, तसेच पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आनंदवली ते होळकर पुलाखालीदेखील गाळ साचला असून, तो हटविल्यास साठवण क्षमता वाढण्याबरोबरच ग्राऊंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळेल, असे देवांग जानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते आणि त्यामुळे नदीला पूर येतो. हे टाळण्यासाठी पावसाळी गटारींचे पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरवले तर भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होईल, त्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती आणि मविप्र वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते विनामोबदला सहकार्य करण्यास तयार असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.