शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे

By admin | Updated: July 18, 2016 00:40 IST

विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला देशभरात मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले. रावसाहेब सभागृहात पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय : राष्ट्र समर्पित जीवन’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, यशवंत पाटील, श्रीकांत बेनी, धनपाल शाह, नितीन महाजन, नाना शिलेदार, चतूर नेरे, राहुल निर्भवणे, नगरसेवक सतीश सोनवणे आदि प्रमुख पाहुण्यांसह आमदार सीमा हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी घळसासी यांनी दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट व त्यांची विचारसरणीविषयी उपस्थितांना परिचय करून दिला. ते म्हणाले, भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून ते आजच्या भारतीय जनता पार्टीच्या यशामागे पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, सुंदरसिंग भंडारी यांसारख्या राष्ट्राप्रति जीवन समर्पित करणाऱ्या नेत्यांचे बलिदान आहे. जनसंघाने स्थापनेपासून बलिदानच मागितले. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्षपदाची सूत्र सांभाळताना बलिदानाची तयारी असल्याचे विधान केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे अशा राष्ट्राप्रति समर्पित भावनेतून दिलेल्या बलिदानाच्या पायावर उभ्या असलेल्या सत्तेने हुरळून न जाता भारतीय जनता पार्टीच्या कार्यर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)