शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

बाणगंगाकाठच्या गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:25 IST

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देगंगापूर धरणातून आवर्तन : शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.बाणगंगा काठावरील दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, ओणे, थेरगाव, कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या सर्व गावांचा पाणीपुरवठा हा बाणगंगेच्या काठावर असलेल्या विहिरींवर आधारित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाणगंगा कोरडीठाक पडल्याने बाणगंगा काठच्या सात गावांतील शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्षबागा, फूलशेती कोमजली असून, जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहे.पाण्यासाठी नागरिक दररोज भटकंती करीत आहे. टंचाईची गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून (दि.२) गंगापूर धरणातून डाव्या कालव्यातून बाणगंगेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.सोमवारी दुपारपर्यंत पाणी दात्याने बंधाºयापर्यंत पोहचले होते. बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. गंगापूर धरणातून डाव्या कालव्याला १७५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, बाणगंगा काठावरील गावांना पिण्यासाठी बाणगंगेत ७० क्यूसेक, तर १६ नंबर चारीला २५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (दि.५) सकाळी मौजे व कसबे-सुकेणेला पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दोन्हीही बंधारे भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मौजे सुकेणेचे विलास गडाख यांनी सपत्निक बाणगंगेचे पाणी पूजन केले.