शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पुनर्विवाह केलेल्या विधवांना ‘कुटुंब निवृत्तिवेतन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:48 IST

सन २०१५ पूर्वी पुनर्विवाह केलेल्या महिलांनाही पहिल्या पतीच्या कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार

ठळक मुद्देअगोदर मुलांना प्राधान्य २०१५ पूर्वीच्यांनाही मिळणार लाभ

नाशिक : शासकीय सेवेत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर दुसरा विवाह करणाºया पत्नीला पतीच्या कुटुंब निवृत्तिवेतनापासून वंचित ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयात आता बदल करण्यात आला असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता सन २०१५ पूर्वी पुनर्विवाह केलेल्या महिलांनाही पहिल्या पतीच्या कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार आहे, मात्र असे वेतन देताना पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयामुळे ज्यांचे वेतन बंद करण्यात आले होते, त्यांचे वेतन आता सुरू करण्यात येणार आहे.शासकीय सेवेतील पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला दरमहा कुटुंब निवृत्तिवेतन देण्याचा कायदा होता, परंतु नंतर त्या विधवेने दुसºया व्यक्तीशी पुनर्विवाह केल्यानंतर महाराष्टÑ नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६ (५) नुसार तिचे निवृत्तिवेतन बंद करण्यात येत होते. अशा घटनांमध्ये पत्नीने पुनर्विवाह केला तरी, तिला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांची आर्थिक मदतीअभावी हेळसांड होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या संदर्भात राज्य सरकारने ११ जून २०१५ मध्ये निवृत्तिवेतन नियमात सुधारणा करून, शासकीय सेवेतील पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह करणाºया महिलेला कुटुंब निवृत्तिवेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या कायद्याची अंमलबजावणी ११ जून २०१५ पासून पुढे करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गेल्या अडीच वर्षांत पुनर्विवाह करणाºया विधवांनाही पहिल्या पतीच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तिवेतन मिळत होते. परंतु शासनाने २०१५ पासून पुढे हा निर्णय घेतल्याने अनेक विधवा महिलांना त्यापासून वंचित राहावे लागल्याची बाब निदर्शनास आल्याने शासनाने पुन्हा आपल्याच निर्णयात बदल केला आहे. यापुढे पहिल्या पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह केलेल्या सर्व विधवांना कुटुंब निवृत्तिवेतन देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच २०१५ पूर्वी जरी तिने विवाह केला असेल तरी तिला नव्याने कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळेल मात्र जेव्हापासून तिचे कुटुंब निवृत्तिवेतन बंद करण्यात आले त्याचा फरक देण्यात येणार नाही तर तिने अर्ज केल्यापासून वेतन दिले जाणार आहे. त्यासाठी तिने तिचा पती ज्या शासकीय कार्यालयात नोकरीस होते तेथे अर्ज करावा लागणार आहे.