शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

धार्मिक स्थळ कारवाईविरोधी लोकप्रतिनिधीही एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:34 IST

महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्याची तयारी चालविली असतानाच, सोमवारी (दि. ६) महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चुकीच्या सर्वेक्षणावर केल्या जाणाºया कारवाईला आक्षेप घेतला. यावेळी महापौरांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

नाशिक : महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्याची तयारी चालविली असतानाच, सोमवारी (दि. ६) महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चुकीच्या सर्वेक्षणावर केल्या जाणाºया कारवाईला आक्षेप घेतला. यावेळी महापौरांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.महापालिकेमार्फत रस्त्यांवर अडथळा ठरणाºया १५० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन असल्याने दि. ८ नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने सुरू केलेल्या कार्यवाहीला धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह नागरिक, महंत, लोकप्रतिनिधी यांनीही आक्षेप घेतला आहे. सोमवारी (दि. ६) महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, गटनेते, मठांचे महंत, धार्मिक स्थळांचे विश्वस्त, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीत, आमदार बाळासाहेब सानप यांनी शहराची शांतता अबाधित राहण्यासाठी विचारपूर्वक कृती करण्याची गरज असून, फेरसर्वेक्षणाची सूचना केली. आमदार देवयानी फरांदे यांनी सदर सर्वेक्षण चुकीचे असून, पुन्हा सुनावणी घेऊन फेरसर्वेक्षण करण्याची सूचना केली. त्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्याचीही सूचना त्यांनी केली. राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार यांनी रहदारीला अडथळे ठरणार असतील तर ती धार्मिक स्थळे स्थलांतरित करता येतील परंतु, ज्यांना लोकमान्यता आहे आणि रस्त्यात अडथळा नाही, अशा धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाऊ नये, असे सांगितले. कारवाईप्रसंगी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शेलार यांनी दिला. शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी महापालिकेने चोरी-छुप्या पद्धतीने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्याचे सांगत फेरसर्वेक्षणाची मागणी केली. मनसेचे गटनेता सलीम शेख यांनी लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करतानाच नगररचना विभागाने अनुकूल अभिप्राय दिला असतानाही अतिक्रमण विभागामार्फत नोटिसा चिकटविण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी रस्त्यांवर अडथळा ठरणारी स्थळे सामोचाराने बाजूला स्थलांतरित करता येणार असल्याचे सांगत कारवाई थांबविण्याची मागणी केली. महंत भक्तिचरणदास यांनी न्यायालयाचा सन्मान राखून मार्ग काढण्याची विनंती केली मात्र, लोकभावनेच्या श्रद्धेला तडा जाणार नाही, याचीही काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी सुरेश दलोड, नंदन भास्करे यांनीही सूचना केल्या. काही उपस्थित कार्यकर्ते, वकील यांनी नोटिसा चिकटवताना नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार केली.  सरतेशेवटी, महापौर रंजना भानसी यांनी महापालिका प्रशासनाने केलेले सर्वेक्षणच चुकीचे असल्याचा आरोप करत स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशित केले. प्रशासनाने एक महिन्याच्या आत त्याबाबत शासन आणि न्यायालयाला माहिती अवगत करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. न्यायालयाच्या निर्देशानुसारच कारवाई न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच महापालिकेमार्फत अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारी करून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. लोकमान्यता असलेल्या २४९ धार्मिक स्थळांची यादी असून, ६७४ धार्मिक स्थळे ही सार्वजनिक मोकळ्या जागांवर आहेत. रस्त्यांवर असलेल्या १५० धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने १०५ धार्मिक स्थळे हटविण्यात आलेली आहेत. १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे असतील तर त्याबाबत कुणी दस्तावेज, पुरावे सादर केल्यास कारवाईबाबत पुनर्विचार करता येईल. गेल्या दीड वर्षांपासून कारवाई सुरू आहे आणि त्याबाबत ७५ हरकतींवर सुनावणीही झाल्याची माहिती बहिरम यांनी दिली. प्रभारी आयुक्तांना निवेदन अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झाले असून, फेरसर्वेक्षण करण्याची मागणी करणारे निवेदन महापौर रंजना भानसी यांनी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपाचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल आदी उपस्थित होते.