शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:43 AM

नाशिक : महाराष्टÑ राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाºयांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.राज्य शासनाने १९८१च्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून ...

नाशिक : महाराष्टÑ राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाºयांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.राज्य शासनाने १९८१च्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून सरकारी आस्थापनेत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र समाजकल्याण विभागाने या आदेशाला न जुमानता सुरक्षारक्षकांना बेकायदेशीरपद्धतीने कामावरून कमी करून खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त केले होते. यासाठी सुरक्षा रक्षकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. समाजकल्याण विभागाने २०११ पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकताना कोणतेही लेखीपत्र दिलेले नाही. यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती.या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप यांची संयुक्त बैठकही झाली होती. यावेळी सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्ष रक्षकांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी अ. का. लक्कस आणि अपर सचिव अहिरे यांनी नाशिक समाज कल्याण विभागाला सुरक्षा रक्षक मंडळातर्फे स्थापित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.