शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रँकर सुरू झाल्याने खर्डेवासीयांना दिलासा

By admin | Updated: July 5, 2014 00:22 IST

ट्रँकर सुरू झाल्याने खर्डेवासीयांना दिलासा

देवळा : तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या खर्डे गावातील ग्रामस्थ व महिलांना मंगळवारपासून पाण्याचा टँकर सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. खर्डे गावाचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी शासनाने दोन विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अधिग्रहीत केलेल्या दोन्ही विहिरींना सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी होते. जून महिन्याच्या पूर्वार्धातच या विहिरींनी तळ गाठल्याने खर्डे गावातील नागरिकांना गत दोन आठवड्यांपासून भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. गतवर्षी खर्डा ग्रामपंचायतीने केलेल्या बोअरवेलला जे थोडेफार पाणी लागले होते त्यावरच सर्व गाव अवलंबून होते. परंतु गावाच्या लोकसंख्येचा विचार करता बोअरवेलचे अल्प पाणी पाहता गावासाठी ते पाणी पुरेसे नव्हते. यामुळे रात्रंदिवस या बोअरवेलवर महिलांची झुंबड उडे व उभे राहूनही पाणी मिळत नसल्याने पाण्यावरून वादविवाद व्हायचे.सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जगताप व नागरिकांनी तहसीलदार शर्मिला भोसले यांच्याकडे खर्डा गावातील पाणीटंचाईची समस्या मांडली व टँकर सुरू करण्याची मागणी केली. तहसीलदारांनी टँकरला मंजुरी दिल्याने मंगळवारपासून खर्डा येथे पाण्याचा टँकर नियमितपणे सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.तीन वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम सुरू आहे. योजनेची किंमत ५८ लाख रुपये असून, योजना अपूर्णावस्थेत आहे. दीड वर्षापासून संबंधित ठेकेदाराने उर्वरित काम सुरूकेलेले नाही तसेच कामाचा दर्जा निकृष्ट असून, सदोष नियोजनामुळे योजना रखडल्याची नागरिकांची तक्रार आहे. (वार्ताहर)