शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी

By admin | Updated: September 1, 2014 01:25 IST

शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी

नाशिक : राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात पहिल्यांदा शेतजमिनींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच शेतजमिनींच्या पुनर्मोजणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जमिनींचे मोठ्या प्रमाणात झालेले पोटविभाजन, प्रत्यक्ष वहिवाट, भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात निर्माण झालेला गोंधळ, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीविषयक वाद निर्माण होऊन विकास प्रक्रियेत अडथळे उत्पन्न होत असतात. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट खोऱ्यातील १२ गावांमध्ये पुनर्मोजणीचा पथदर्शी प्रकल्प मागील दोन वर्षांत राबविला होता. या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे राज्याची पुनर्मोजणी करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने पुनर्माेजणी करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून, राज्याची मोजणी तीन टप्प्यांत करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिकसह पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांत शेतजमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. ग्राउंड कंट्रोल पॉर्इंट निर्मिती, नकाशांचे डिजिटलायझेशन आणि सॅटेलाईट इमेजद्वारे ही मोजणी खासगी संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मोजणी नकाशाचे वाटप करून हरकतींवर निर्णय घेणे, गावाचा नकाशा तयार करणे, गावाचे नवीन महसूल रेकॉर्ड लागू करण्याची कार्यवाही आदि बाबी भूमिअभिलेख विभागामार्फत राबविल्या जाणार आहेत. नागरिकांना मोजणी नकाशाचे वाटप झाल्यानंतर भोगवटादारांकडून प्रतिएकर ३०० रुपये सनद फी घेण्यात येणार आहे. या पुनर्मोजणीमुळे नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक विकासाचे प्रकल्प राबविणे, शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेणे व जमीनविषयक वाद निकाली काढण्यास मदत होणार आहे.