शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोनवेळ पाणीपुरवठ्यास प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:59 IST

मनपा व्यवस्था सुरळीत : शिवसेनेची मागणी फेटाळली नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.

मनपा व्यवस्था सुरळीत : शिवसेनेची मागणी फेटाळली

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.यंदा गंगापूर धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे, शहरात दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. परंतु, सद्यस्थितीत शहरात एकवेळ सुरू असलेला पाणीपुरवठा योग्य असल्याचे समर्थन प्रशासनाने केले आहे. सद्यस्थितीत पंचवटी, नाशिकरोड तसेच पूर्व विभागातील काही भागांत दोनवेळ पाणीपुरवठा केला जात आहे, तर अन्यत्र एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. सर्वसाधारणपणे दीड ते अडीच तास पाणीपुरवठ्याची वेळ आहे. शहरात १०९ जलकुंभ असून ते भरण्याकरिता लागणारा वेळ आणि वितरण व्यवस्थेकरिता आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ पाहता दोनवेळ पाणीपुरवठा करणे शक्यच नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शहरात दोनवेळ पाणीपुरवठा केल्यास वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत व्हॉल्व्हमनची संख्याही अपुरी आहे. अशा स्थितीत दोनवेळ पाणीपुरवठा अशक्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेने दोनवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली असताना पक्षाचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी मात्र सिडको भागात दोनवेळ पाणीपुरवठा तांत्रिकदृष्ट्या होऊच शकत नसल्याचे स्पष्ट मत सिडको प्रभाग समिती सभेत व्यक्त केले आहे. त्यामुळे दोनवेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीवरून सेनेतच मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.दिवाळीत अर्धातास वेळ वाढविणार दिवाळीचा उत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी साफसफाईला वेग येणार आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. पाण्याची मागणी लक्षात घेता पाणीपुरवठ्याची वेळ अर्धातासाने वाढविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. सध्या प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल धरणातून केली जात आहे.