शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

नाशिक : महापालिकेत सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी दणका दिला होता.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत एकाच विभागात एकाच जागी वर्षानुवर्षांपासून भुजंगासन घालून बसलेल्या सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दणका दिला होता. महापालिकेच्या इतिहासात एकाच वेळी झालेल्या बदल्यांचा हा ‘गेडाम पॅटर्न’ चर्चेत ठरला होता. मात्र, गेडाम यांच्या बदलीनंतर वर्षभरातच मर्जीतल्या अनेक कर्मचाऱ्यांची पूर्वीच्याच विभागात पुनर्स्थापना झालेली असून, प्रशासनानेच ‘गेडाम पॅटर्न’ गुंडाळून ठेवला आहे. दरम्यान, गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी बदल्यांविषयक धोरण नियमावली तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, अद्याप नियमावलीची प्रतीक्षा कायम असून, यावर्षी बदल्यांची चर्चाही ऐकायला मिळत नाही. महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली होती. वर्षानुवर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. गेडाम यांनी पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, तर दुसऱ्या टप्प्यात २८५ लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना झटका देत मुख्यालयातून त्यांची रवानगी विभागीय कार्यालयांमध्ये केली होती. गेडाम यांच्या या दणक्यामुळे अनेक कामचुकारांची कोंडी झाली होती. प्रशासकीय कामकाजात झालेल्या या साफसफाई मोहिमेचे स्वागतही झाले आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची टीकाही झाली. गेडाम यांची मागील वर्षी जूनमध्ये बदली झाल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याची ओरड काही विभागप्रमुखांकडून झाली. आपल्या मर्जीतल्या लोकांची अन्यत्र बदली झाल्याने विभागप्रमुखांचीही गैरसोय झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी काही बदल्यांबाबत फेररचना केली. परंतु, गेल्या वर्षभरात बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना झाली असून, अनेकांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेवर ठाण मांडले आहे. त्यात काही कर्मचाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव तर काहींची लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवरून झाली असून, ज्या प्रशासनाने बदल्यांचा कठोर निर्णय घेतला त्याच प्रशासनाने गेडाम पॅटर्न पूर्णपणे गुंडाळून ठेवत अनेकांना ‘अभय’ दिले आहे.