शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

नाशिक : महापालिकेत सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी दणका दिला होता.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत एकाच विभागात एकाच जागी वर्षानुवर्षांपासून भुजंगासन घालून बसलेल्या सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दणका दिला होता. महापालिकेच्या इतिहासात एकाच वेळी झालेल्या बदल्यांचा हा ‘गेडाम पॅटर्न’ चर्चेत ठरला होता. मात्र, गेडाम यांच्या बदलीनंतर वर्षभरातच मर्जीतल्या अनेक कर्मचाऱ्यांची पूर्वीच्याच विभागात पुनर्स्थापना झालेली असून, प्रशासनानेच ‘गेडाम पॅटर्न’ गुंडाळून ठेवला आहे. दरम्यान, गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी बदल्यांविषयक धोरण नियमावली तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, अद्याप नियमावलीची प्रतीक्षा कायम असून, यावर्षी बदल्यांची चर्चाही ऐकायला मिळत नाही. महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली होती. वर्षानुवर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. गेडाम यांनी पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, तर दुसऱ्या टप्प्यात २८५ लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना झटका देत मुख्यालयातून त्यांची रवानगी विभागीय कार्यालयांमध्ये केली होती. गेडाम यांच्या या दणक्यामुळे अनेक कामचुकारांची कोंडी झाली होती. प्रशासकीय कामकाजात झालेल्या या साफसफाई मोहिमेचे स्वागतही झाले आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची टीकाही झाली. गेडाम यांची मागील वर्षी जूनमध्ये बदली झाल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याची ओरड काही विभागप्रमुखांकडून झाली. आपल्या मर्जीतल्या लोकांची अन्यत्र बदली झाल्याने विभागप्रमुखांचीही गैरसोय झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी काही बदल्यांबाबत फेररचना केली. परंतु, गेल्या वर्षभरात बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना झाली असून, अनेकांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेवर ठाण मांडले आहे. त्यात काही कर्मचाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव तर काहींची लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवरून झाली असून, ज्या प्रशासनाने बदल्यांचा कठोर निर्णय घेतला त्याच प्रशासनाने गेडाम पॅटर्न पूर्णपणे गुंडाळून ठेवत अनेकांना ‘अभय’ दिले आहे.