शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणांसह विविध योजनांसाठी आता एकच अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्व सुलभ व्हावे यासाठी ...

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणांसह विविध योजनांसाठी आता एकच अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्व सुलभ व्हावे यासाठी महाडीबीटी पोर्टल तयार करण्यात आले असून, शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे दिला जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्यापासून ते थेट योजनेचा लभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीयप्रणाली विकसित करण्यात आली आहे. शेतीशीनिगडित विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत भरण्यात आलेल्या अर्जांतून लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

चौकट -

मोबाइल क्रमांक आधारला लिंक करणे आवश्यक

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या लिंकवर गेल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडून तेथे आपली माहिती भरावी. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करून त्यांना अर्ज करता येईल.

चौकट -

ट्रॅक्टर, ठिबक, यांत्रिकीकरण , फलोत्पादन, कांदाचाळ आदींसह कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

कोट -

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एकच अर्ज करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत व योजनांचा लाभ घ्यावा. कृषी विभागाला मिळणाऱ्या उद्दिष्टानुसार लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक

कोट -

कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आता वेगवेगळे अर्ज करण्याची गरज नसल्याने कागदपत्र जुळवाजुळव करण्याचा ताण बऱ्यापैकी कमी झाला असून, शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मात्र आता आपला नंबर कधी लागणार याची चिंता आहे. - अशोक दौंडे, शेतकरी