शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

वैधता प्रमाणपत्र देतांना संबंधित विभागाची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:40 IST

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेवळा : शासन परीपत्रकांकडे दुर्लक्ष; अर्जदार झाले त्रस्त

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अधिसुचनेनुसार राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गासाठी त्यांना शासकीय सेवातील तसेच शिक्षणातील आरक्षित जागांचा लाभ मिळण्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबर जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे शासनाकडे अनेक तक्र ारी येत होत्या. या प्रक्रि येत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वैधता प्रमाणपत्रे विलंबाने मिळण्यामुळे संबंधित विद्याथ्र्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन, त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली.या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व अन्य संबंधितांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे वारंवार परिपत्रके काढून सुचना देण्याची वेळ शासनावर आली आहे.रक्ताच्या नात्यातील व्यक्तिचे जात वैधता प्रमाणपत्र असतांनाही अर्जदाराला पुर्वीप्रमाणेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. नुकतेच ६ मार्च २०१९ रोजी जात वैधता प्रमाणपत्र देतांना सुधारीत अधिसुचनेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सुचना देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. परंतु उपयोग झालेला नाही.वैधता प्रमाणपत्र मिळणे कठीण होऊन बसले होते. १९५० ते १९६७ पूर्वीचे जातीचे पुरावे सादर करणे अवघड जात असल्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागून काल अपव्यय होत होता. त्यामुळे मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात अडचणी येत. त्यांना शिष्यवृत्ती, शुल्क सवलतही मिळणे कठीण होते.