शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

वैधता प्रमाणपत्र देतांना संबंधित विभागाची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:40 IST

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेवळा : शासन परीपत्रकांकडे दुर्लक्ष; अर्जदार झाले त्रस्त

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अधिसुचनेनुसार राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गासाठी त्यांना शासकीय सेवातील तसेच शिक्षणातील आरक्षित जागांचा लाभ मिळण्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबर जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे शासनाकडे अनेक तक्र ारी येत होत्या. या प्रक्रि येत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वैधता प्रमाणपत्रे विलंबाने मिळण्यामुळे संबंधित विद्याथ्र्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन, त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली.या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व अन्य संबंधितांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे वारंवार परिपत्रके काढून सुचना देण्याची वेळ शासनावर आली आहे.रक्ताच्या नात्यातील व्यक्तिचे जात वैधता प्रमाणपत्र असतांनाही अर्जदाराला पुर्वीप्रमाणेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. नुकतेच ६ मार्च २०१९ रोजी जात वैधता प्रमाणपत्र देतांना सुधारीत अधिसुचनेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सुचना देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. परंतु उपयोग झालेला नाही.वैधता प्रमाणपत्र मिळणे कठीण होऊन बसले होते. १९५० ते १९६७ पूर्वीचे जातीचे पुरावे सादर करणे अवघड जात असल्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागून काल अपव्यय होत होता. त्यामुळे मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात अडचणी येत. त्यांना शिष्यवृत्ती, शुल्क सवलतही मिळणे कठीण होते.