शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अधिकच्या मोबदल्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : द्राक्षबाग शेतकऱ्यांना अपील करण्याचा सल्ला

नाशिक : समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.समृद्धी महामार्गात जाणाºया द्राक्षबागायत शेतकºयांना जालना येथे देण्यात आलेल्या जादा मोबदल्याप्रमाणेच अधिकचा मोबदला मिळावा, अशी सिन्नर तालुक्यातील काही शेतकºयांची मागणी आहे. बागायतदारांना द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी अडून बसले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य होणार नसल्याने शेतकºयांना विभागीय अधिकाºयांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रस्ते विकास महामंडळाकडे संंबंधित शेतकºयांनी दिलेल्या निवदेनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समृद्धी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, सिन्नरच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, इगतपुरीचे प्रांताधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. या शेतकºयांची मागणी विसंगत आणि अव्यहार्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांनी सदर मागणी फेटाळली आहे.जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. महामार्गाकरिता जिल्ह्यात एक हजार हेक्टरहून अधिक जमिन संपादित करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे १२०० कोटी रुपयांचा मोबदलाही शेतकºयांना देण्यात आला आहे. परंतु अजूनही सात ते आठ हेक्टर क्षेत्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आलेले नाही. जादा मोबदल्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून सदर जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. चर्चेअंति यातून सकारात्मक मार्ग काढता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांना सांगितले. मात्र शेतकरी जादा मोबदल्याच्या मागणीसाठी अडून बसल्याने संबंधित शेतकरी आता विभागीय आयुक्तांचा दरवाजा ठोठविण्याच्या तयारीत आहेत.जालना येथे अधिकच्या मोबदल्याचा दावाजालना येथेही काही शेतकºयांच्या द्राक्षबागा महामार्गात गेल्या आहेत. त्यांना तेथील प्रशासनाने प्रतिझाड ११ हजार रु पये दराने मोबदला दिल्याचा या शेतकºयांचा दावा असून, इकडे साडेचार ते साडेपाच हजार रुपये दराने मोबदला मिळाल्याची त्यांची तक्र ार आहे. मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी या शेतकºयांनी बैठकीत केली. निर्यात दराच्या निकषाने मोबदला निश्चित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा दर मान्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग