शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अधिकच्या मोबदल्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : द्राक्षबाग शेतकऱ्यांना अपील करण्याचा सल्ला

नाशिक : समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.समृद्धी महामार्गात जाणाºया द्राक्षबागायत शेतकºयांना जालना येथे देण्यात आलेल्या जादा मोबदल्याप्रमाणेच अधिकचा मोबदला मिळावा, अशी सिन्नर तालुक्यातील काही शेतकºयांची मागणी आहे. बागायतदारांना द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी अडून बसले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य होणार नसल्याने शेतकºयांना विभागीय अधिकाºयांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रस्ते विकास महामंडळाकडे संंबंधित शेतकºयांनी दिलेल्या निवदेनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समृद्धी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, सिन्नरच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, इगतपुरीचे प्रांताधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. या शेतकºयांची मागणी विसंगत आणि अव्यहार्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांनी सदर मागणी फेटाळली आहे.जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. महामार्गाकरिता जिल्ह्यात एक हजार हेक्टरहून अधिक जमिन संपादित करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे १२०० कोटी रुपयांचा मोबदलाही शेतकºयांना देण्यात आला आहे. परंतु अजूनही सात ते आठ हेक्टर क्षेत्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आलेले नाही. जादा मोबदल्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून सदर जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. चर्चेअंति यातून सकारात्मक मार्ग काढता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांना सांगितले. मात्र शेतकरी जादा मोबदल्याच्या मागणीसाठी अडून बसल्याने संबंधित शेतकरी आता विभागीय आयुक्तांचा दरवाजा ठोठविण्याच्या तयारीत आहेत.जालना येथे अधिकच्या मोबदल्याचा दावाजालना येथेही काही शेतकºयांच्या द्राक्षबागा महामार्गात गेल्या आहेत. त्यांना तेथील प्रशासनाने प्रतिझाड ११ हजार रु पये दराने मोबदला दिल्याचा या शेतकºयांचा दावा असून, इकडे साडेचार ते साडेपाच हजार रुपये दराने मोबदला मिळाल्याची त्यांची तक्र ार आहे. मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी या शेतकºयांनी बैठकीत केली. निर्यात दराच्या निकषाने मोबदला निश्चित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा दर मान्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग