शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उन्हाळ कांद्याची ‘लाली’ फिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, ...

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांदा दाखल झाला तरी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करतात. साठवलेला कांदा अजूनही विक्रीसाठी आणला जात आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. उन्हाळ कांदाच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. कमी दराने व्यापारी कांदा खरेदी करतात. कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा साठवणूक आणि इतर खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. परिणामी खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. बियाणे, रोपे तयार करणे शेतीची मशागत करणे, खते देणे, औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. शिवाय शेतकऱ्यांना चार महिने पाणी द्यावे लागते. इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल दराने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

कोट....

कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधने यामुळे कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत असतो. व्यापारी वर्गाच्या विक्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर त्यात चार पैसे व्यापाऱ्यालासुद्धा मिळतात; पण वेगवेगळ्या कारणांमुळे बाजारभाव पडतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापारी या दोघांना बसतो.

- अनंत भुतडा,

कांदा व्यापारी, सायखेडा

कोट....

ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रुपये दर मिळूनदेखील कांदा परवडत नाही. किमान तीन हजार रुपये दर मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहतील. मात्र अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात चढउतार होत आहे. आता तर लाल कांदा आल्याने उन्हाळ कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवत आहे.

- उत्तम हाडपे, शेतकरी, म्हाळसाकोरे

फोटो- ०५ सायखेडा बाजार

सायखेडा बाजार समितीच्या आवारात झालेली कांदा आवक.