शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे अडले घोडे

By admin | Updated: July 18, 2014 00:35 IST

पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे अडले घोडे

नाशिक : शहरात पूररेषा आखल्यानंतर महापालिकेने गावठाणातील वाड्यांना दुरुस्तीसाठी परवानग्या देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यापूर्वी महासभेत चर्चा होऊनही कार्यवाही होत नसल्याने गुरुवारी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. तथापि, आयुक्तच उपस्थित नसल्याने या विषयावरील चर्चा पुढील सभेत करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.२००८ मध्ये महापूर आल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या पूररेषा आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांच्या परवानग्या महापालिकेकडून स्थगित करण्यात आल्या आणि नवीन बांधकामांना परवानग्या देणेच बंद करण्यात आले आहे. त्याचा गावठाण भागातील वाड्यांना फटका बसला आहे. वाड्यांच्या दुरुस्तीसाठीही पालिका परवानगी देत नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. यासंदर्भात नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, शाहू खैरे, गुरुमित बग्गा आणि संजय चव्हाण यांनी पालिकेच्या गुरुवारच्या सभेत लक्षवेधी मांडली होती. वाडे दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वाडेमालक इमारती उभ्या करीत आहेत. त्यामुळे पालिकेचे विकास शुल्क बुडत आहे. त्याचा विचार करता पालिकेने वाड्यांच्या पुनर्विकासासाठी मान्यता द्यावी, त्यासाठी मिळकतधारकांना स्वत:च्या हमीवर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तथापि, आजच्या सभेस आयुक्त संजीवकुमार आणि नगररचना विभागाचे सहायक संचालक शेंडे अनुपस्थित असल्याने महापौरांनी पुढील सभेत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)