शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाही मार्गाचा होणार फेरविचार

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

शाही मार्गाचा होणार फेरविचार

 नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी अरुंद मार्गांवरून जाणाऱ्या साधू-महंतांच्या मिरवणुकीदरम्यान सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे आता ही गल्ली टाळण्यासाठी प्रशासनाने गणेशवाडीतून मिरवणूक नेण्याचा प्रस्ताव सुचवला आहे. त्यासंदर्भात आखाडा परिषद लवकरच निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. महंत ग्यानदास यांच्यासह अन्य महंतांनी शनिवारी याबाबत पाहणी केल्यानंतर तशी तयारी दर्शविली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारी करीत आहे. गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००३ मध्ये पर्वणीच्या दिवशी साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण शाही मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहेच, मुख्यत्वे काळाराम मंदिर ते सरदार चौक या भागाचेही रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यास विरोधही होत आहे. त्यामुळे तपोवनातून महामार्ग ओलांडून काट्या मारुतीपर्यंत शाही मिरवणूक आल्यानंतर ती लक्ष्मण झुला पुलावरून आणि नाग चौकातून नेण्याऐवजी सरळ गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाच्या खालून रामकुंड असा एक पर्याय सुचविण्यात आला आहे. सोमवारी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत ग्यानदास आणि अन्य महंतांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत लक्ष्मीनारायण मंदिरपासून काट्या मारुती आणि तेथून गणेशवाडीमार्गे रामसेतूपर्यंतच्या पर्यायी शाही मार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर लक्ष्मण झुला पूल, नाग चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक ते रामकुंड या मार्गाची पाहणी केली.या दोन्ही मार्गांची पाहणी केली आहे आता सर्व आखाड्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग वापरायचा किंवा नाही, याचा विचार केला जाईल असे महंत ग्यानदास यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाला भूमिका कळविली जाईल, असे सांगतानाच त्यांनी कुंभमेळ्यासाठी यंत्रणेचे प्रारूप तयार झाले आहे, तसेच साधू-महंतही तयार करीत असून, त्याबाबत लवकरच प्रशासनाला माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. साधुग्रामसाठी लागणाऱ्या जागेबाबत शेतकऱ्यांचा विरोध आहे,यावर बोलताना त्यांनी कुंभमेळ्यासाठी गेल्या कुंभमेळ्यात जेवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यापैकी मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक होती. साधू-महंतांनी वाढत्या नागरीकरणामुळे या भागातील किमान साडेतीनशे एकर जागा राखीव ठेवावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता शासन- प्रशासन काय करीत आहे, हे माहीत नाही. परंतु गरज भासल्यासच शेतकऱ्यांची जमीन घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)