शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच भरती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:31 IST

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़  खोब्रागडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे दोनदिवसीय राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यांतील केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील व सेवानिवृत्त वर्ग एक व दोनच्या सुमारे दोनशे अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले़ केंद्र व राज्य सरकार आपल्या साडेचार वर्षांतील कारकिर्दीचे सेलेबे्रशन करीत आहे, त्यांनी केलेल्या कामाची उपलब्धी आहेच मात्र ती कोणासाठी आहे हे पाहणेदेखील गरजेचे आहे़ सरकारने कमकुवत घटकांसाठी केलेले काम त्यांना जाणवले तरच लोकहितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणता येईल़ मात्र, सरकारच्या कामगिरीचे तटस्थपणे मूल्यमापन केल्यास सरकार अन्याय-अत्याचाराचे सेलेब्रेशन कसे करू शकते, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले़  फोरमच्या माध्यमातून मागासवर्गीय अधिकाºयांना संविधानानुसार मिळालेले अधिकार, आरक्षण, बढत तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारला जाणार आहे़ मागास विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीदेखील मिळालेली नाही, तसेच सर्वप्रथम राज्यातील एक लाख ३० हजार पदांचा मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा व त्यानंतरच मेगा भरती करावी, असे म्हणत या भरतीला विरोध केला़ यावेळी सहसचिव डॉ. बबन जोगदंड, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय अध्यक्ष रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते़फोरममधील ठरावमागासवर्गीय अधिकाºयांच्या आरक्षण, बढती, महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारणाऱ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहाच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार. सरकारने मागासवर्गीय समाजाच्या अनुशेषाची पदे अगोदर भरून मगच ७२ हजार जागा भराव्यात. एकूण ८५ टक्के लोकसंख्येला ५० टक्के आरक्षण आहे व उर्वरित १५ टक्के नागरिकांना ५० टक्के आरक्षण दिले जात आहे. शासनाने याचा विचार करूनच नवीन आरक्षण नीती अवलंबावी. आदिवासींच्या वनजमिनी ताब्यात द्याव्या. बोगस आदिवासी प्रमाणपत्र सादर करणाºयांची हकालपट्टी करावी. ‘यूपीएससी’तील सहसचिव पदावरील ‘बॅक डोअर एन्ट्री’ थांबवावी.

टॅग्स :Governmentसरकार