शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच भरती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:31 IST

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़  खोब्रागडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे दोनदिवसीय राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यांतील केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील व सेवानिवृत्त वर्ग एक व दोनच्या सुमारे दोनशे अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले़ केंद्र व राज्य सरकार आपल्या साडेचार वर्षांतील कारकिर्दीचे सेलेबे्रशन करीत आहे, त्यांनी केलेल्या कामाची उपलब्धी आहेच मात्र ती कोणासाठी आहे हे पाहणेदेखील गरजेचे आहे़ सरकारने कमकुवत घटकांसाठी केलेले काम त्यांना जाणवले तरच लोकहितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणता येईल़ मात्र, सरकारच्या कामगिरीचे तटस्थपणे मूल्यमापन केल्यास सरकार अन्याय-अत्याचाराचे सेलेब्रेशन कसे करू शकते, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले़  फोरमच्या माध्यमातून मागासवर्गीय अधिकाºयांना संविधानानुसार मिळालेले अधिकार, आरक्षण, बढत तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारला जाणार आहे़ मागास विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीदेखील मिळालेली नाही, तसेच सर्वप्रथम राज्यातील एक लाख ३० हजार पदांचा मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा व त्यानंतरच मेगा भरती करावी, असे म्हणत या भरतीला विरोध केला़ यावेळी सहसचिव डॉ. बबन जोगदंड, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय अध्यक्ष रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते़फोरममधील ठरावमागासवर्गीय अधिकाºयांच्या आरक्षण, बढती, महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारणाऱ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहाच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार. सरकारने मागासवर्गीय समाजाच्या अनुशेषाची पदे अगोदर भरून मगच ७२ हजार जागा भराव्यात. एकूण ८५ टक्के लोकसंख्येला ५० टक्के आरक्षण आहे व उर्वरित १५ टक्के नागरिकांना ५० टक्के आरक्षण दिले जात आहे. शासनाने याचा विचार करूनच नवीन आरक्षण नीती अवलंबावी. आदिवासींच्या वनजमिनी ताब्यात द्याव्या. बोगस आदिवासी प्रमाणपत्र सादर करणाºयांची हकालपट्टी करावी. ‘यूपीएससी’तील सहसचिव पदावरील ‘बॅक डोअर एन्ट्री’ थांबवावी.

टॅग्स :Governmentसरकार