शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यात ३६ तासात विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:32 IST

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. नाशिक शहरातील अनेक भागात सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने दुपारी काही वेळ विश्रांती घेतली, मात्र दुपारी चार वाजेनंतर आकाशात काळे ढग दाटून जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे पाऊण तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय होऊन अनेक ठिकाणी घरांमध्ये, तळघरांत पाणी साचले. त्यामुळे रस्ता वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. दिवसभरात नाशिक शहरात २० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्णातील ग्रामीण भागात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, फक्त नांदगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. सर्वाधिक पावसाची नोंद सुरगाणा व त्यानंतर कळवण तालुक्यात करण्यात आली आहे. बुधवारीही पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्णात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, कळवण, सुरगाणा या तालुक्यात पाऊस झाला.पावसाच्या संततधारेने शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकºयांनी साठवलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालविली असता पावसामुळे कांदा ओला होऊन सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर द्राक्षबागांच्या छाटणीवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बागांमध्ये पाणी साठू लागल्याने त्यामुळे पालवी फुटण्यास विलंब होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कापणीवर आलेले सोयाबीन, तूर, भुईमूग, मका व बाजरी पिकानांही फटका बसला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यंदा १ जून ते ११ आॅक्टोबरदरम्यान जिल्ह्यात १२५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव तालुकावगळता चौदा तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली असून, नाशिक तालुक्यात १९० टक्के इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १०९ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.