शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६ तासात विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:32 IST

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. नाशिक शहरातील अनेक भागात सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने दुपारी काही वेळ विश्रांती घेतली, मात्र दुपारी चार वाजेनंतर आकाशात काळे ढग दाटून जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे पाऊण तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय होऊन अनेक ठिकाणी घरांमध्ये, तळघरांत पाणी साचले. त्यामुळे रस्ता वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. दिवसभरात नाशिक शहरात २० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्णातील ग्रामीण भागात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, फक्त नांदगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. सर्वाधिक पावसाची नोंद सुरगाणा व त्यानंतर कळवण तालुक्यात करण्यात आली आहे. बुधवारीही पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्णात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, कळवण, सुरगाणा या तालुक्यात पाऊस झाला.पावसाच्या संततधारेने शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकºयांनी साठवलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालविली असता पावसामुळे कांदा ओला होऊन सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर द्राक्षबागांच्या छाटणीवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बागांमध्ये पाणी साठू लागल्याने त्यामुळे पालवी फुटण्यास विलंब होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कापणीवर आलेले सोयाबीन, तूर, भुईमूग, मका व बाजरी पिकानांही फटका बसला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यंदा १ जून ते ११ आॅक्टोबरदरम्यान जिल्ह्यात १२५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव तालुकावगळता चौदा तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली असून, नाशिक तालुक्यात १९० टक्के इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १०९ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.