शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

कांदा अनुदानाचा फेरविचार करा

By admin | Updated: September 2, 2016 22:42 IST

५०० रुपये क्विंटलची मागणी : दीपिका चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : कांद्याला राज्य सरकारने १०० रुपयांऐवजी ५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याबाबत फेरविचार करावा, या मागणीचे निवेदन आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.जिल्ह्यात प्रचंड उत्पादनामुळे कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अत्यंत कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. शासनाच्या शेतमाल नियमनमुक्त धोरणामुळे व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन कांदा गोणीत आणला तरच लिलावात सहभागी होऊ, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली. या काळात चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केल्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला १०० रुपये प्रमाणे प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने नुकताच घेतला आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. कांद्याचा उत्पादन खर्च पाहता लागणीपासून ते काढणीपर्यंत जवळपास १२०० ते १५०० रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. याबाबतचा १०० रुपये अनुदान देताना शासनाने कुठेही विचार केलेला नाही. एका शेतकऱ्यास हे अनुदान २०० क्विंटलपर्यंतच मिळणार आहे. ही दुसरी अटसुद्धा जाचक आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे कमीत कमी ५०० ते १००० क्विंटल कांदा उत्पादन करणारे आहेत. त्यामुळे सरसकट विक्री केलेल्या पावतीवरच अनुदान मिळावे आदि मागण्यांचे निवेदन आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. (प्रतिनिधी)