शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जेवणावळीच्या पायघड्यांचा पुनश्च प्रत्यय

By admin | Updated: March 28, 2017 00:56 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू आहे.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू असून, साहित्य क्षेत्रातून याबाबत आश्चर्य व्यक्तकेले जात आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात एका पॅनलने जेवणावळी घातल्यानंतर दुसऱ्या अन्य पॅनलनेही त्यांची बरोबरी करत जेवणावळी घालून आम्हीही प्रचारात मागे नाही हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ज्यांनी त्यावेळी ‘डिनर डिप्लोमसी’चा डांगोरा पिटला त्यांच्याकडूनच जेवणावळीचा असा घाट घातल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या जेवणावळीचे फोटो सोशल माध्यमातून फिरल्याने जेवणावळीचा प्रकार समोर आला होता, ही बाब लक्षात ठेवत ‘डिनर डिप्लोमसी’ म्हणवणाऱ्यांनी आपल्या जेवणावळी रात्री उशिरापर्यंत या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता निर्विघ्न पार पाडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच सावानाच्या निवडणुका रंग घेऊ लागल्याने मत मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा कौशल्याचा कोणाला कितपत फायदा होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)धर्मादाय आयुक्तांकडे वर्ग केलेल्या खटल्याचा युक्तिवाद दोन्ही गटांकडून सोमवारी (दि. २७) पूर्ण करण्यात आला. एक दा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नसल्याने आता बुधवारी (दि. २९) किंवा गुरुवारी (दि. ३०) या प्रकरणाची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत या प्रकरणी निकाल देण्याचे आदेश दिलेले असल्याने धर्मादाय आयुक्तयाप्रकरणी काय निकाल देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.‘त्या’ फलकाचा ‘अनोखा प्रवास’रेडक्रॉस सिग्नल परिसरात एका पॅनलकडून भला मोठा प्रचाराचा फलक उभारण्यात आला आहे. याच फलकावरून प्रचारातील वादाची पहिली ठिणगी पडली होती. फलक लावण्यासाठी या पॅनलकडून मनपातर्फे रितसर परवानगी घेण्यात आली असली तरी रविवारी (दि. २६) फलक लावण्याची मुदत संपुष्टात आली आहे. मुदत संपूनही हा फलक तेथेच असल्याने संबंधित पॅनलनेही हा फलक उतरवून घेण्याचे सौजन्य दाखविले नाही आणि मनपा प्रशासनाकडूनही याबाबत काणाडोळा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.