शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

नामस्मरण केल्याने ईश्वरप्राप्ती : स्वामी संविदानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:11 IST

परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला.

त्र्यंबकेश्वर : परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला. येथील श्री चंद्र भवन येथे श्रावण महिन्यानिमित्त कोलकाता येथील शिवसेवा संस्थानच्या वतीने आयोजित सामूहिक शिव महापुराण कथा सप्ताहात ते हितगुज करीत होते. कथेचे वाचक बालव्यास पं. श्रीकांतजी शर्मा असून, मुख्य यजमान राजेन्द्रप्रसाद अरविंद लाठी हे आहेत. आज मंगळवारी श्रीराम जन्म व हनुमान जन्माची कथा सांगण्यात आली. यावेळी स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, अनेक ऋषी-मुनींनी गोदावरी प्रगट करण्यासाठी प्रयत्न केले. पण गौतम ऋषींना भगवान विष्णूंनी गायीचे रूप धारण करून गोहत्या घडवून आणली. गौतम ऋषींकरवी आपल्या तपश्चर्येने गोदामाईला प्रगट व्हावे लागले असे हे ठिकाण आहे.भगवान त्र्यंबकेश्वराच्या तीन मुखांचे विश्लेषण त्यांनी समजावून सांगून काळा, गोरा व सावळ्या रंगाच्या गुणांबद्दल सविस्तर सांगितले. रज तम व सत्त्व गुणांची फोड करताना त्यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने प्रसंग समजावून सांगितले. यावेळी हनुमान जन्मस्थानाबद्दलही त्यांनी सांगून त्या ठिकाणी बाल हनुमान मातोश्रीच्या मांडीवर असल्याचे सांगून त्याठिकाणी दर्शन घेण्याचे आवाहन केले. मनापासून परमेश्वराचे स्मरण करा. त्याने ईश्वरभक्तीची प्राप्ती होते. या ठिकाणी नवनाथांची मुख्य अनुपान शिला असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण असल्याचेही स्वामी संविदानंद यांनी सांगितले. दरम्यान, बालव्यास वाचक पं. श्रीकांत शर्मा यांनी अर्धनारी नटेश्वर भगवान विष्णूचे मोहिनी रूप आदींबाबत वर्णन करूनसाक्षात भगवान शिवदेखील मोहित झाल्याचे सांगितले, तर गौतमांची कन्या अंजलीचीही कथा आपल्या रसाळ वाणीने ऐकविली. भाविक तल्लीन होऊन ऐकत होते. या कथेचा शिवकथेत उल्लेख आहे. शिवकथेचा समारोप येत्या गुरुवारी होणार आहे.