शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मिळालेली मुदतवाढ सत्कारणी लागो !

By श्याम बागुल | Updated: August 10, 2019 17:08 IST

जिल्हा परिषदेत अडीच वर्षापुर्वी महिला राज अवतरल्याने ज्या आत्मीयतेने महिला घरसंसार व कुटूंब सावरतात, तसाच कारभार जिल्हा परिषदेत होईल व पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार वठणीवर येईल अशी अपेक्षा सर्वत्र बाळगली गेली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत गेल्या सव्वा दोन वर्षात चार मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बदल्या बाल विकास प्रकल्प अधिका-यांचे निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत.

श्याम बागुलनाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, मुदतवाढीचे वेध लागलेल्या व त्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना एकदाची चार महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिल्याने साहजिकच शासनाचे गोडवे गाण्याबरोबरच आगामी काळात जोमाने काम करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. मुळात गेली सव्वा दोन वर्षे पदाधिका-यांनी प्रशासनाला सोबत घेवून कोणतेही दृष्य स्वरूपात असे भरीव काम केले नाही हे ते स्वत: देखील जाणून आहेत. विशेष म्हणजे ग्रामविकास राज्यमंत्रीपद जिल्ह्यात असतानाही जिल्हा परिषदेत गेल्या सव्वा दोन वर्षात चार मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बदल्या झाल्या तर आजही अनेक अधिका-यांची पदे रिक्त आहेत. अशीच परिस्थिती यापुढेही कायम राहिल्यास पदाधिका-यांच्या मुदतवाढीला जसा अर्थ राहणार नाही, तसाच जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावल्याचा प्रशासनाला दावाही करता येणार नाही.

जिल्हा परिषदेत अडीच वर्षापुर्वी महिला राज अवतरल्याने ज्या आत्मीयतेने महिला घरसंसार व कुटूंब सावरतात, तसाच कारभार जिल्हा परिषदेत होईल व पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार वठणीवर येईल अशी अपेक्षा सर्वत्र बाळगली गेली. ती न बाळगण्यात कमीपणा घेण्यात अर्थ नाही. परंतु ज्या पद्धतीने कारभाराची सुरूवात झाली ते पाहता सव्वा दोन वर्षात त्यात काही सुधारणा झालेली दिसली नाही, ती दिसली असती तर गेल्या दोन वर्षात अखर्चित राहिलेली शंभर कोटीची रक्कम शासनाकडे परत जाण्याची नामुष्की आली नसती. शासनाच्या योजनांसाठी मिळणारा निधी व सेसमधून मिळणारा पैसा खर्च करण्यासाठी पदाधिका-यांना जसा वेळ मिळाला नाही, तसाच तो खर्च करण्याचे उत्तरदायित्व असलेल्या अधिका-यांनाही त्याचे दोन वर्षात सोयर सुतक वाटले नाही. यामागचे कारण दोन वर्षानंतरही स्पष्ट झालेले नसले तरी, पदाधिकारी व प्रशासन यांचे सूत कधीच जुळले नाही. पदाधिका-यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी बदली करून घेतली. त्यानंतर दीपककुमार मीना या थेट आयएएस अधिका-याचे आगमन झाल्यानंतरही परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. जिल्हा परिषदेची सर्व सुत्रे ताब्यात ठेवण्यात प्रयत्नशील असलेल्या नरेश गिते यांचा कारभारही पदाधिका-यांच्या पचनी पडला नाही. पुर्णवेळ समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषदेला मिळू शकला नाही, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. ग्रामपंचायत विभाग असो वा सामान्य प्रशासन विभाग ते देखील वा-यावर आहेत. कुपोषणाचा महत्वाचा प्रश्न आ वासून उभा ठाकला असताना बाल विकास प्रकल्प अधिका-यांचे निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेची वाटचाल सुरू असताना पदाधिका-यांना पुन्हा चार महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिली आहे. या मुदतवाढीचे मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले व ज्या प्रमाणे सव्वा दोन वर्षापुर्वी पदभार घेतांना गतीमान व पारदर्शी कारभार करण्याचा दावा केला गेला, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा करण्यात आली आहे. गेल्या सव्वा दोन वर्षाच्या स्वत:च्या कामकाजाचे सिंहावलोकन पदाधिका-यांनी केले असते तर त्यांना पुन्हा तशाच ढंगाची प्रतिक्रीया देण्याची गरज पडली नसती. जिल्हा परिषदेत महिला राज अवतरल्याचे दिसत असले तरी, त्यांच्याआडून पुरूषी मानसिकतेनेच गेल्या सव्वा दोन वर्षे कारभार चालविला गेला आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यातही पुरूषी मानसिकतेनेच कारभार होणार असेल तर शासनाने दिलेली मुदतवाढ सत्कारणी लागण्याविषयी शंका घेणे जाणेही साहजिकच आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद