शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

भाजपाची बंडखोरी, विरोधकांनाही तारी

By admin | Updated: February 12, 2017 00:34 IST

कॉँग्रेसचे मोठे आव्हान : दलबदलूंची कसोटी

नाशिक : मतदार भाजपाला अनुकूल वाटावे, असा मानल्या जाणाऱ्या पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १२ मधील गेल्या वीस वर्षांत कॉँग्रेस, मनसेने संमिश्र यश मिळवले. आत्ता उच्चभ्रु वसाहतीचा हा प्रभाग भाजपाला पुन्हा अनुकूल वाटत असताना बंडखोरीने डोके वर काढले असून, त्यामुळेच अडचणीचे ठरले आहे. अर्थात, महात्मानगर ते मुंबई नाका दरम्यानच्या या प्रभागात कॉँग्रेसचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.महात्मानगर, कॉलेजरोड, शरणपूररोड, तिडके कॉलनीपासून मुंबई नाक्यापर्यंतच्या या प्रभागात उमेदवारांनी सामाजिक, ज्ञाती संख्येचे गणिते काहीही बांधले असले तरी त्यापेक्षा वेगळे म्हणजे सर्व धर्मीय म्हणजे अगदी सिंधी - ख्रिश्नच बांधवांचाही त्यात समावेश आहे. प्रभाग उच्चभ्रु अधिक असला तरी त्यात सहा झोपडपट्ट्या असून, त्यामुळे अत्यंत समतोल? असा प्रभाग आहे. गेल्या चार निवडणुकांपासून महात्मानगर भागाचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे करीत होते, तर शरणपूर भागाचे नेतृत्व गेल्या पाच पंचवार्षिक कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे करीत आहेत. त्यापुढील भागात कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि मनसेच्या सुजाता डेरे यांनी नेतृत्व केले आहे. तथापि, एकंदरच सध्याच्या भौगोलिक रचनेचा विचार केला, तर कॉँग्रेसचे प्राबल्य अधिक दिसते. परंतु राज्यातील सत्ता बदलाने भाजपाचा हुरूप वाढला आहे. त्याचा एक परिणाम म्हणून कॉँग्रेसचे चारवेळा निवडून आलेले नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यासमवेत असलेल्या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवक छाया ठाकरे यांनी कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी अल्पविराम घेतला आहे. उत्तमराव कांबळे यांनी आता समीर कांबळे यांच्या त्यांच्या मुलाला पुढे केले असून, आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांच्यासमवेत असलेल्या आणि उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या योगीता अहेर यांनीही पक्ष बदल करून उमेदवारी केली आहे. भाजपाचे चार आणि आघाडीतील चारही जागा काँग्रेसला दिल्याने या पक्षाचे चार तसेच शिवसेनेचे चार आणि भाजपाचे दोन प्रमुख बंडखोर अशी प्रभागाची स्थिती असून त्यामुळे आज मितीला सर्वच पक्षांच्या दृष्टीने फेअर वॉर्ड आहे. अर्थात, आजवर शिवसेनेला या प्रभागात जम बसवता आला नसून नवख्या उमेदवारांवर त्यांची मदार आहे. प्रभागातील ब या नागरिकांचा मागासवर्गीय प्रभागात भाजपाचे उमेदवार हेमंत धात्रक यांना पक्षाचे बंडखोर सुरेश पाटील यांनी आव्हान दिले आहे. सुरेश पाटील मूळ कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपदही भूषविले आहे. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी ते भाजपात झाले आणि गेल्यावेळी याच प्रभागात पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी दावेदारी करणाऱ्या पाटील यांना महापालिकेची उमेदवारी न देता पक्षात फारसे सक्रिय नसलेल्या हेमंत धात्रकांना उमेदवारी न दिल्याने पाटील रिंगणात उतरले आहेत. याच प्रभागात कॉँग्रेसचे समीर कांबळे हे दावेदार आहेत. याशिवाय तुषार अहेर (शिवसेना), अमर काठे (मनसे) हेदेखील रिंगणात आहेत. सर्वसाधारण जागेसाठी भाजपाचे शिवाजी गांगुर्डे, कॉँग्रेसचे शैलेश कुटे यांच्यात प्रमुख लढत असली तरी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश दीक्षित यांनी बंडखोरी केली आहे. कुटे हे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष असून, त्यांची गांगुर्डे यांना कडवी झुंज असणार आहे. (प्रतिनिधी)