शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वीज भारनियमनामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:35 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौरांनीही महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौरांनीही महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे. दोन दिवसांत शहरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाºयांनी दिली आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते सहा तासांपर्यंत अघोषित वीज भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी उत्सवाच्या तोंडावर भारनियमनाचा खेळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेने थेट महावितरणला पत्र देत अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे. महावितरणकडे एक्स्प्रेस फीडरची व्यवस्था असताना भारनियमन केले जात असल्याने जलकुंभ भरण्यात अडथळे निर्माण होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर अखंडित वीजपुरवठा अनिवार्य आहे. मात्र, विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महापालिकेवरच नागरिकांचा रोष येत असून, महावितरणने तातडीने भारनियमन थांबवत अखंडित वीजपुरवठा करावा, असे मनपाने कळविले आहे. दरम्यान, शहरात अघोषित भारनियमनाबाबत वाढत्या तक्रारीवरून भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी महावितरणच्या अधिकाºयांची तातडीची बैठक बोलावत त्यांना जाब विचारला. यावेळी महापौर रंजना भानसी देखील उपस्थित होत्या. शहराला जोडण्यात आलेली बरीचशी खेडी ही महावितरणने ग्रामीण भागाला जोडली असल्याने या खेड्यांना भारनियमनाचा चटका सोसावा लागतो आहे. सदर खेडी ही ग्रामीण भागातून काढून ती शहराला जोडण्याची सूचना सानप यांनी केली. त्याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे यांनी दोन दिवसांत त्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच एक्स्प्रेस फीडरवरून अखंडित वीजपुरवठा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.