शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमनामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:35 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौरांनीही महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौरांनीही महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे. दोन दिवसांत शहरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाºयांनी दिली आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते सहा तासांपर्यंत अघोषित वीज भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी उत्सवाच्या तोंडावर भारनियमनाचा खेळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेने थेट महावितरणला पत्र देत अखंडित वीजपुरवठ्याची जाणीव करून दिली आहे. महावितरणकडे एक्स्प्रेस फीडरची व्यवस्था असताना भारनियमन केले जात असल्याने जलकुंभ भरण्यात अडथळे निर्माण होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर अखंडित वीजपुरवठा अनिवार्य आहे. मात्र, विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महापालिकेवरच नागरिकांचा रोष येत असून, महावितरणने तातडीने भारनियमन थांबवत अखंडित वीजपुरवठा करावा, असे मनपाने कळविले आहे. दरम्यान, शहरात अघोषित भारनियमनाबाबत वाढत्या तक्रारीवरून भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी महावितरणच्या अधिकाºयांची तातडीची बैठक बोलावत त्यांना जाब विचारला. यावेळी महापौर रंजना भानसी देखील उपस्थित होत्या. शहराला जोडण्यात आलेली बरीचशी खेडी ही महावितरणने ग्रामीण भागाला जोडली असल्याने या खेड्यांना भारनियमनाचा चटका सोसावा लागतो आहे. सदर खेडी ही ग्रामीण भागातून काढून ती शहराला जोडण्याची सूचना सानप यांनी केली. त्याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे यांनी दोन दिवसांत त्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच एक्स्प्रेस फीडरवरून अखंडित वीजपुरवठा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.