शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

By admin | Updated: April 14, 2016 23:40 IST

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

नांदगाव : कायदा धाब्यावर बसवून नदीपात्रातच वीटभट्ट्या नांदगाव : तालुक्यातील जलस्त्रोतांची क्षमतेच्या नीचांकाकडे वाटचाल सुरू असताना व पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती नजीकच्या काळात येऊ घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शासनाचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात असलेल्या अवैध वीटभट्ट्यांना पाणी कसे मिळते आणि दिवसेंदिवस गावाकडे सरकणाऱ्या या भट्ट्यांना महसूल विभागाचे संरक्षण कसे मिळते? याचे उत्तर प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी देतील का? जमिनींच्या नावांमधले फेरफार व बेकायदेशीर प्रकरणांची माहिती अधूनमधून चव्हाट्यावर येत असताना मूग गिळून बसलेले प्रशासन वीटभट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा का गप्प आहे. काही वर्षे आधी नांदेश्वरी देवीलगत सरकलेल्या भट्ट्या तत्कालीन प्रशासनाने हटविल्या. पण वर्ष दोन वर्षात त्या पुन्हा गावाकडे सरकल्या. त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संशयाची सुई त्यामुळे फिरत असते. पाणी बचतीचे महत्त्व शिरपूर पॅटर्नमधून कळाले असले व शासन स्तरावर त्याचा डंका पिटला जात असला तरी नांदगावची महसूल यंत्रणा जणू काही घडलेले नाही अशा आविर्भावात या प्रकाराकडे बघत आहे. नदीचे वाळवंट बनलेल्या नांदगावच्या शाकांबरी व तिच्या उपनदीचे नदीपात्र जणू पैसे कमविण्याचे कुरण बनले आहे. अतिक्रमणांमुळे नांदगाव मधील नद्यांची अवस्था तर जवळजवळ गटारांसारखी झाली आहे. तालुक्याच्या प्रशासनाचा गाडा गेल्या काही महिन्यात लुळापांगळा झाल्याचा बोलबाला आहे. पाऊस पडत नाही म्हणून नदीपात्रांची वाट लावत त्याकडे संवेदनाहीन नजरेने बघायचे. नोव्हेंबर २००९ मध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या शहाराची भीषण अवस्था करून ठेवली होती. त्याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुनील गाढे यांनी नदीपात्रांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर काही काळ लोटत नाही तोच पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने नदीपात्र गिळंकृत करण्याचा झपाटा सुरु जाला. तो इतका की आता ऐन नदीपात्राच्या मध्यभागातच अतिक्रमणांचे बस्तान थाटले आहे.हे कमी पडते की काय म्हणून, आता ...नदीपात्राच्या मध्यातच रोजरोस वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यांना असे परवाने देताना गौणखनिज कायद्याच्या कोणत्या नियमान्वये त्या दिल्या. याचा खुलासा तहसीलदार अनिल गवांदे यांना देता आला नाही. वीटभट्ट्यांमधून सल्फर डायआॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनाक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायुंमुळे होणारे डोळ्यांचे विविध विकार, श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग हे कॉमन आहेत. वीटभट्ट्यांमुळे हवेतल्या कार्बनचे प्रमाण वाढून परिसरातील तपमानात वाढ होते. त्याचा परिणाम शेती व आरोग्यावर होत असतो. मात्र सब कुछ चलता है चा नारा महसूल विभाग किती बेफिकीरीने देत असतो व सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो याचे नांदगाव मधील उपरोल्लिखित उदाहरण एक ‘आदर्श’ उदाहरण ठरले तर वावागे वाटू नये. बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र नांदगावच्या महसूल यंत्रणा या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहात नसल्याकारणाने बिनबोभाटपणे सगळीकडे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरु होत आहेत. (वार्ताहर)