शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

By admin | Updated: April 14, 2016 23:40 IST

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

नांदगाव : कायदा धाब्यावर बसवून नदीपात्रातच वीटभट्ट्या नांदगाव : तालुक्यातील जलस्त्रोतांची क्षमतेच्या नीचांकाकडे वाटचाल सुरू असताना व पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती नजीकच्या काळात येऊ घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शासनाचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात असलेल्या अवैध वीटभट्ट्यांना पाणी कसे मिळते आणि दिवसेंदिवस गावाकडे सरकणाऱ्या या भट्ट्यांना महसूल विभागाचे संरक्षण कसे मिळते? याचे उत्तर प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी देतील का? जमिनींच्या नावांमधले फेरफार व बेकायदेशीर प्रकरणांची माहिती अधूनमधून चव्हाट्यावर येत असताना मूग गिळून बसलेले प्रशासन वीटभट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा का गप्प आहे. काही वर्षे आधी नांदेश्वरी देवीलगत सरकलेल्या भट्ट्या तत्कालीन प्रशासनाने हटविल्या. पण वर्ष दोन वर्षात त्या पुन्हा गावाकडे सरकल्या. त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संशयाची सुई त्यामुळे फिरत असते. पाणी बचतीचे महत्त्व शिरपूर पॅटर्नमधून कळाले असले व शासन स्तरावर त्याचा डंका पिटला जात असला तरी नांदगावची महसूल यंत्रणा जणू काही घडलेले नाही अशा आविर्भावात या प्रकाराकडे बघत आहे. नदीचे वाळवंट बनलेल्या नांदगावच्या शाकांबरी व तिच्या उपनदीचे नदीपात्र जणू पैसे कमविण्याचे कुरण बनले आहे. अतिक्रमणांमुळे नांदगाव मधील नद्यांची अवस्था तर जवळजवळ गटारांसारखी झाली आहे. तालुक्याच्या प्रशासनाचा गाडा गेल्या काही महिन्यात लुळापांगळा झाल्याचा बोलबाला आहे. पाऊस पडत नाही म्हणून नदीपात्रांची वाट लावत त्याकडे संवेदनाहीन नजरेने बघायचे. नोव्हेंबर २००९ मध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या शहाराची भीषण अवस्था करून ठेवली होती. त्याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुनील गाढे यांनी नदीपात्रांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर काही काळ लोटत नाही तोच पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने नदीपात्र गिळंकृत करण्याचा झपाटा सुरु जाला. तो इतका की आता ऐन नदीपात्राच्या मध्यभागातच अतिक्रमणांचे बस्तान थाटले आहे.हे कमी पडते की काय म्हणून, आता ...नदीपात्राच्या मध्यातच रोजरोस वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यांना असे परवाने देताना गौणखनिज कायद्याच्या कोणत्या नियमान्वये त्या दिल्या. याचा खुलासा तहसीलदार अनिल गवांदे यांना देता आला नाही. वीटभट्ट्यांमधून सल्फर डायआॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनाक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायुंमुळे होणारे डोळ्यांचे विविध विकार, श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग हे कॉमन आहेत. वीटभट्ट्यांमुळे हवेतल्या कार्बनचे प्रमाण वाढून परिसरातील तपमानात वाढ होते. त्याचा परिणाम शेती व आरोग्यावर होत असतो. मात्र सब कुछ चलता है चा नारा महसूल विभाग किती बेफिकीरीने देत असतो व सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो याचे नांदगाव मधील उपरोल्लिखित उदाहरण एक ‘आदर्श’ उदाहरण ठरले तर वावागे वाटू नये. बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र नांदगावच्या महसूल यंत्रणा या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहात नसल्याकारणाने बिनबोभाटपणे सगळीकडे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरु होत आहेत. (वार्ताहर)