शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस खरा मित्र...

By किरण अग्रवाल | Updated: March 11, 2018 01:51 IST

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे.

ठळक मुद्देगावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार सुरूच१३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे. एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खूनसत्रांमुळे नाशकातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मध्यंतरी शंकाच घेतली जात होती. परंतु अशा प्रकरणातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरातून मिरवण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर गावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम झाला आहे. छापेमारी करूनही जुगार अड्डे सुरूच असल्याची व किरकोळ कारणातून सार्वजनिक ठिकाणच्या वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार मात्र सुरूच आहेत हा भाग वेगळा. परंतु त्याही बाबतीत पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जाताना दिसून येत आहेत. हे नित्यनैमित्तिक काम करतानाच नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सामाजिक जागृतीच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापर, वाहनांचे भोंगे अनावश्यकरीत्या न वाजविण्यासारख्या व महिलांची सुरक्षितता तसेच सायबर क्राइमसाठी जनजागृतीपर ज्या काही मोहिमा सुरू केल्या आहेत त्यातून खाकी वर्दीतील पोलिसांचा सामाजिक चेहराही पुढे येऊन गेला आहे. यातील काही मोहिमा सुरू करताना खूपच चांगला प्रतिसाद लाभला असला तरी नंतर तो काहीसा थंडावलाही. परंतु नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीच्या जाणिवा जागृत करण्यात त्या नक्कीच उपयोगी ठरल्या. याखेरीज सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुन्हा घरी’ या उपक्रमाने मात्र पोलिसांमधील माणुसकीचा वेगळाच अनुभव आणून दिल्याचे म्हणावे लागेल. कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्याची पायरी चढणाºया व कोर्ट-कचेºयात अडकून वेळ वाया घालवणाºया पती-पत्नीचे महिला सुरक्षा विभाग व अभियोग कक्षाच्या सदस्यांद्वारे समुपदेशन करून या उपक्रमांतर्गत तब्बल १३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त केले गेले आहे ही खूप मोठी बाब आहे. संसाराचा गाडा ओढताना काहीसा खडखडाट होतच असतो. त्यातून मतभिन्नता वाढीस लागून नाते तुटण्यावर येऊन ठेपते. अशा नाजूक वळणावर संबंधिताना मानसिक आधार देत गैरसमज दूर करण्याची भूमिका या उपक्रमाद्वारे घेतली जाते. त्यामुळेच बहुसंख्य कुटुंबे पुन्हा सुखाने नांदू लागली आहेत. पोलीस आयुक्त सिंगल यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सदरचा ‘पुन्हा घरी’ उपक्रम हा समस्या बाधितांना निव्वळ पोलिसी कारवाईपासून परावृत्त करणाराच नसून शासनाच्याही अपेक्षेनुसार सामाजिक व कौटुंबिक कलहापासून मुक्ती मिळवून देणाराच ठरला आहे.

टॅग्स :Policeपोलिस