शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पोलीस खरा मित्र...

By किरण अग्रवाल | Updated: March 11, 2018 01:51 IST

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे.

ठळक मुद्देगावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार सुरूच१३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे. एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खूनसत्रांमुळे नाशकातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मध्यंतरी शंकाच घेतली जात होती. परंतु अशा प्रकरणातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरातून मिरवण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर गावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम झाला आहे. छापेमारी करूनही जुगार अड्डे सुरूच असल्याची व किरकोळ कारणातून सार्वजनिक ठिकाणच्या वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार मात्र सुरूच आहेत हा भाग वेगळा. परंतु त्याही बाबतीत पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जाताना दिसून येत आहेत. हे नित्यनैमित्तिक काम करतानाच नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सामाजिक जागृतीच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापर, वाहनांचे भोंगे अनावश्यकरीत्या न वाजविण्यासारख्या व महिलांची सुरक्षितता तसेच सायबर क्राइमसाठी जनजागृतीपर ज्या काही मोहिमा सुरू केल्या आहेत त्यातून खाकी वर्दीतील पोलिसांचा सामाजिक चेहराही पुढे येऊन गेला आहे. यातील काही मोहिमा सुरू करताना खूपच चांगला प्रतिसाद लाभला असला तरी नंतर तो काहीसा थंडावलाही. परंतु नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीच्या जाणिवा जागृत करण्यात त्या नक्कीच उपयोगी ठरल्या. याखेरीज सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुन्हा घरी’ या उपक्रमाने मात्र पोलिसांमधील माणुसकीचा वेगळाच अनुभव आणून दिल्याचे म्हणावे लागेल. कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्याची पायरी चढणाºया व कोर्ट-कचेºयात अडकून वेळ वाया घालवणाºया पती-पत्नीचे महिला सुरक्षा विभाग व अभियोग कक्षाच्या सदस्यांद्वारे समुपदेशन करून या उपक्रमांतर्गत तब्बल १३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त केले गेले आहे ही खूप मोठी बाब आहे. संसाराचा गाडा ओढताना काहीसा खडखडाट होतच असतो. त्यातून मतभिन्नता वाढीस लागून नाते तुटण्यावर येऊन ठेपते. अशा नाजूक वळणावर संबंधिताना मानसिक आधार देत गैरसमज दूर करण्याची भूमिका या उपक्रमाद्वारे घेतली जाते. त्यामुळेच बहुसंख्य कुटुंबे पुन्हा सुखाने नांदू लागली आहेत. पोलीस आयुक्त सिंगल यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सदरचा ‘पुन्हा घरी’ उपक्रम हा समस्या बाधितांना निव्वळ पोलिसी कारवाईपासून परावृत्त करणाराच नसून शासनाच्याही अपेक्षेनुसार सामाजिक व कौटुंबिक कलहापासून मुक्ती मिळवून देणाराच ठरला आहे.

टॅग्स :Policeपोलिस