शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पोलीस खरा मित्र...

By किरण अग्रवाल | Updated: March 11, 2018 01:51 IST

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे.

ठळक मुद्देगावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार सुरूच१३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे. एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खूनसत्रांमुळे नाशकातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मध्यंतरी शंकाच घेतली जात होती. परंतु अशा प्रकरणातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरातून मिरवण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर गावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम झाला आहे. छापेमारी करूनही जुगार अड्डे सुरूच असल्याची व किरकोळ कारणातून सार्वजनिक ठिकाणच्या वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार मात्र सुरूच आहेत हा भाग वेगळा. परंतु त्याही बाबतीत पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जाताना दिसून येत आहेत. हे नित्यनैमित्तिक काम करतानाच नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सामाजिक जागृतीच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापर, वाहनांचे भोंगे अनावश्यकरीत्या न वाजविण्यासारख्या व महिलांची सुरक्षितता तसेच सायबर क्राइमसाठी जनजागृतीपर ज्या काही मोहिमा सुरू केल्या आहेत त्यातून खाकी वर्दीतील पोलिसांचा सामाजिक चेहराही पुढे येऊन गेला आहे. यातील काही मोहिमा सुरू करताना खूपच चांगला प्रतिसाद लाभला असला तरी नंतर तो काहीसा थंडावलाही. परंतु नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीच्या जाणिवा जागृत करण्यात त्या नक्कीच उपयोगी ठरल्या. याखेरीज सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुन्हा घरी’ या उपक्रमाने मात्र पोलिसांमधील माणुसकीचा वेगळाच अनुभव आणून दिल्याचे म्हणावे लागेल. कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्याची पायरी चढणाºया व कोर्ट-कचेºयात अडकून वेळ वाया घालवणाºया पती-पत्नीचे महिला सुरक्षा विभाग व अभियोग कक्षाच्या सदस्यांद्वारे समुपदेशन करून या उपक्रमांतर्गत तब्बल १३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त केले गेले आहे ही खूप मोठी बाब आहे. संसाराचा गाडा ओढताना काहीसा खडखडाट होतच असतो. त्यातून मतभिन्नता वाढीस लागून नाते तुटण्यावर येऊन ठेपते. अशा नाजूक वळणावर संबंधिताना मानसिक आधार देत गैरसमज दूर करण्याची भूमिका या उपक्रमाद्वारे घेतली जाते. त्यामुळेच बहुसंख्य कुटुंबे पुन्हा सुखाने नांदू लागली आहेत. पोलीस आयुक्त सिंगल यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सदरचा ‘पुन्हा घरी’ उपक्रम हा समस्या बाधितांना निव्वळ पोलिसी कारवाईपासून परावृत्त करणाराच नसून शासनाच्याही अपेक्षेनुसार सामाजिक व कौटुंबिक कलहापासून मुक्ती मिळवून देणाराच ठरला आहे.

टॅग्स :Policeपोलिस