शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

By admin | Updated: October 5, 2016 23:41 IST

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

नाशिक : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक्स’द्वारे दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले़ त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असून, सागरी सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे़ तसेच फोर्स वन, एटीएस, एटीसी, क्यूआरटी व आरसीपी जवान राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ११४ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ राज्याच्या सीमा सुरक्षिततेच्या मुद्द्यावर माथूर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार व पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षिततेबाबत गंभीर आहे़ मुंबईमधील सागरी सुरक्षिततेसाठी पोलीस दलास ७० नवीन बोटी मिळाल्या असून, याठिकाणी फोर्स वनचे कमांडो तैनात आहेत़ तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्यूआरटी, आरसीएफ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत़ या तिन्ही विभागातील जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली आणखी काही शस्त्रे व साहित्य विकत घेण्याची प्रक्रि या येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे़ मुंबईतील सागरी तळांच्या सुरक्षिततेसाठी चार नवीन सागरी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे़ एनएसजी, बीएसएफ व गुप्तचर यंत्रणांसोबत नियमित बैठका सुरू असून, चांगला समन्वय साधला जात आहे़ राज्यांतर्गत सुरक्षेसाठी विभागीय बैठका तर सीमा व सागरी सुरक्षेबाबत आठ दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे राज्यस्तरीय बैठक झाली होती़ राज्यातील दहशतवादी कारवाई वा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी दहशतवादविरोधी पथक तसेच पोलीस ठाणे स्तरावर असलेल्या एटीसी विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ पोलिसांच्या नेटवर्किंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली असून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतर्क असल्याचे माथूर यांनी सांगितले़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणीपोलिसांवरील कामाचा वाढता ताण त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याची समस्या कमी व्हाव्यात यासाठी दरवर्षी पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ तसेच आजारपणातील तपासणी अहवालाचे जतन केले जाईल़ कामावरील ताण कमी करण्यासाठी वर्षभरातून एकदा सहकुटुंब सहलीसाठी सुटी दिली जाईल़ या सुटीसाठीचा खर्च पूर्वी पोलीस कुटुंब कल्याण मंडळातर्फे केला जात होता तो आता सरकारने करावा, अशी मागणी केली जाणार आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंब सहलींसाठी औरंगाबाद, पुण्यासह विविध ठिकाणावरील ‘हॉलिडे होम’ येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहेत़