शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

By admin | Updated: April 14, 2017 01:21 IST

आंबेडकरांचे साहित्य : जनतेची मागणी पाहता पुस्तकांची उपलब्धता

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ हे गाजलेले पुस्तक शासनाने यंदाही प्रकाशित केले असून, शासनाच्या पाचही डेपोंमध्ये हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. दोन वर्षांपूर्वी सदर पुस्तकांच्या सुमारे ४० हजार प्रती शासनाच्या गुदामात पडून असल्याची बाब समोर आल्याने या पुस्तकाची मागणी अधिकच वाढली होती. ही मागणी लक्षात घेता शासनाने यंदा या पुस्तकाची आगाऊ छपाई करून जयंतीचे औचित्य साधत पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे. समाज आणि जातिव्यवस्थेबाबत परखड चिकित्सा करणारे विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुस्तकात मांडल्याने पूर्वी या पुस्तकावरून बरेच वादळ उठले होते. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क राज्य शासनाकडे असल्याने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊन वितरित करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. दोन वर्षांपूर्वी या पुस्तकाचा वाद राज्यात चांगलाच गाजला होता. शासनाने या पुस्तकाला बंदिस्त केल्याची टीका झाल्यानंतर मागीलवर्षी शासनाने या पुस्तकांची छपाई करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिले होते. परंतु या प्रती कमी पडल्याने मागीलवर्षापासून या पुस्तकाची सातत्याने मागणी वाढत होती. दरम्यान, शासनाकडून डॉ. आंबेडकरांच्या इतर लेखन साहित्यांचे सुमारे ३० खंड प्रकाशित करण्यात येणार असून, २१ खंडांचे प्रकाशन यापूर्वीच झालेले आहे. उर्वरित साहित्याची जुळवाजुळव आणि संशोधनाचे काम पूूर्णत्वास येत आहे. यंदाही आंबेडकरांच्या साहित्याच्या १८व्या खंडाला चांगली मागणी आहे. डॉ. आंबेडकरांच्या गाजलेल्या भाषणांचा संच यामध्ये देण्यात आलेला आहे. १८ व्या खंडाचे अ, ब, क असे एकूण तीन भाग असून, वाचकांनी १८ व्या खंडाचीदेखील मागणी नोंदविली आहे. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातील अंकांचा संच असलेले पुस्तकही यंदा वाचले जात आहे. शासनाच्या नागपूर, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि पुणे येथील केंद्रांवर या पुस्तकांची विक्री सुरू असून, नागपूर आणि मुंबईला सर्वाधिक पुस्तक विक्री होत आहे. येत्या १० तारखेपर्यंत बाबासाहेबांच्या निवडक पुस्तकांवर शासनाने सवलत दिलेली आहे. शासनाच्या डेपोत मिळणाऱ्या पुस्कांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीने सामाजिक न्यायाची पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, त्यांचे विनामूल्य वितरण केले जात आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रंथालये, वाचनालये, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था यांना काही ग्रंथांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)