शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

नाशिक शहरातून राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांसोबतच कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद लातूर, नांदेड, अमरावती अकोला, ...

नाशिक शहरातून राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांसोबतच कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद लातूर, नांदेड, अमरावती अकोला, बुलडाणा यासराख्या विविध शहरांमध्ये तसेच राज्याबाहेरील इंदूर, हैद्राबाद, सुरत. उस्मानाबाद, राजकोट जैसलमेर, जोधपूर यासारख्या शहरांमध्ये प्रवासी बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिकमधून सुमारे अडीचशे प्रवासी बस यातील विविध मार्गांवर चालतात. मात्र कोरोनामुळे संख्याच घटली असून त्यामुळे सध्या अडीचशेऐवजी केवळ शंभर प्रवासी बस सुरू असून त्यातूनही केवळ ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक सुरू असल्याने व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

कोट-१

सध्या कोरोनामुळे मध्यप्रदेश, भोपाळ, इंदूरसारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांना सहजरीत्या प्रवेश दिला जात नाही. प्रवाशांना कोरोना बाधा नसल्याचा वैद्यकीय अहवाल अनिवार्य केल्याने या मार्गावरील प्रवासी संख्या अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे राज्यातील प्रवासी संख्याही घटली आहे. त्यामुळे व्यावसायाला मोठा फटका बसला असून केवळ ४० टक्के व्यावसाय होत असल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिक संकटात सापडले आहे.

- दिलीपसिंग बेनिवाल, अध्यक्ष, नाशिक ट्रॅव्हल्स संघटना

कोट-२

कोरोनाच्या सुरुवातीच्या का‌ळात चार महिने व्यावसाय ठप्प राहिल्यानंतर नोव्हेंबर , डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात व्यावसाय पूर्वपदावर येऊ लागला होता. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने परराज्यात महाराष्ट्रातील बसेसवर निर्बंध आले असून प्रवासी संख्याही घटली आहे. त्यामुळे व्यावसाय पुन्हा संकटात आला आहे.

-प्रेम सोनेजी , ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोट-३

कोरोनामुळे सरकारने पुन्हा निर्बंध लाग केले असून प्रवाशांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रवाशी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून व्यावसाय संकटात आला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

-रमेश दायमा ट्रॅव्हल्स व्यावसायिक

पॉइंटर -

कोरोनापूर्वी बाहरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या -२५०

सध्याची संख्या - १००

व्यावसायाला दहा कोटींचा फटका

कोरोनाच्या काळात सुरुवातीला चार महिने टाळेबंदीनंतर ट्रॅव्हल्स व्यावसाय सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये हळुहळू सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये व्यावसाय पूर्वपदावर येत असताना मार्चमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा निर्बंध लागू केल्याने व्यावसायिक संकटात आले आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभराच्या कालावधील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना जवळपास दहा कोटींचा फटका सहन करावा लागल्याची माहिची व्यावसायिकांनी दिली .