शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

सप्तशृंगगडावर रावेरच्या भाविकाचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: April 20, 2016 00:19 IST

सप्तशृंगगडावर रावेरच्या भाविकाचा उष्माघाताने मृत्यू

कळवण : सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवासाठी आलेल्या एका भाविकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. वना रामदास भिल्ल (६२) असे मृताचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी आहेत. सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. यात अनेक भाविक अनवाणी येतात. रावेर येथील वना भिल्ल हे देवीच्या दर्शनाला आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांना नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान अचानक चक्कर आली. त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिका बोलावली व त्यांना कळवण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सदरचा प्रकार वातावरणातील अतिउष्णतेमुळे घडल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडे याची कोणतीही नोंद नाही. न्यासाच्या वतीने चैत्र यात्रा २०१६साठी येणाऱ्या सर्व भाविक व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन कोटी रु पयांचा जनसुरक्षा विमा उतरविलेला आहे. या माध्यमातून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कायदेशीर पूर्ततेनंतर एक लाखाची मदत मिळू शकते. मात्र मृत्यूची नोंदच नसेल तर मदत कोणत्या आधारावर करायची, हा प्रश्न आहे. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर मजल दरमजल करीत अनवाणी येणाऱ्या देवीभक्तांच्या संख्येत यंदा वाढत्या तपमानामुळे घट झाली आहे. (वार्ताहर)