शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ओळख पटविल्याशिवाय  रेशनचे धान्य मिळणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:21 IST

अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधार लिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या व्यक्तीची ओळख पटविल्याशिवाय धान्य न देण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत.

नाशिक : अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधारलिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या व्यक्तीची ओळख पटविल्याशिवाय धान्य न देण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षापासून शिधापत्रिकाधारकांना रेशनवरून धान्य देताना दुकानदारांनी पॉस यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली असली तरी, सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक पुरवठा खात्याशी संलग्न करण्यात आलेले नसल्यामुळे तसेच काही शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्न असले तरी, त्यांचे अंगठे पॉस यंत्रावर जुळत नसल्याने अशा शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जात होते व त्यासाठी त्यांना धान्य दिल्याची पावती दिली जात होती. आता मात्र सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक पुरवठा खात्याशी संलग्न करण्यात आल्यामुळे एईपीडीएस प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या संदर्भात सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांनी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यात यापुढे पावत्याच्या आधारे रेशनमधून धान्य देणे बंद करण्याचे आदेश दिले. ज्या शिधापत्रिकाधारकाकडे आधार कार्ड नसेल अशा शिधापत्रिकाधारकाला दुकानातच बसवून ठेवावे व त्याबाबत संबंधित पुरवठा निरीक्षकांशी संपर्क साधण्यात यावा. पुरवठा निरीक्षक स्वत: रेशन दुकानात येऊन आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकाची ओळख पटवेल व त्यानंतरच त्याला धान्य दिले जावे, असे सांगितले. तर आधार क्रमांक जुळत नसल्यास स्वत: रेशन दुकानदाराने आपल्याकडील पॉस यंत्राच्या सहाय्याने आधार क्रमांक दुरुस्त करून घ्यावा, अशा सूचना दिल्या.अंगठ्याचे ठसे पॉस यंत्रावर उमटत नाहीतकाही दुकानदारांनी वृद्ध व वयस्क व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे पॉस यंत्रावर उमटत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, आता प्रणाली अधिक अद्ययावत करण्यात आल्यामुळे तसे होणे अशक्य असल्याचे ठासून सांगण्यात आले, याउपरही तसे झालेच तर संबंधित व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी ते जुळवून पाहण्याच्या सल्ला देण्यात आला. मात्र कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक व बोटाचे ठसे जुळविल्याशिवाय धान्य वितरण न करण्याचे तसेच पॉस यंत्राशिवाय व्यवसाय न करण्याची तंबी देण्यात आली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय