शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

रेशन दुकाने पाच दिवसांपासून बंद; धान्य वितरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST

कोरोनामुळे बाधित होऊन गेल्या वर्षभरात राज्यात १३० हून अधिक रेशन दुकानदारांचा बळी गेला असून, अजूनही शेकडो दुकानदार उपचार घेत ...

कोरोनामुळे बाधित होऊन गेल्या वर्षभरात राज्यात १३० हून अधिक रेशन दुकानदारांचा बळी गेला असून, अजूनही शेकडो दुकानदार उपचार घेत आहेत. या सर्वांना काेरोना योद्ध्यांची उपमा देऊन ५० लाखांचे विमा कवच देण्यात यावे. रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करावी आदी मागण्यांसाठी रेशन दुकानदार संघटनेने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने १ मे पासून धान्य न उचलण्याचा तसेच ई-पॉस यंत्र शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला होता. १ व २ मे रोजी शासकीय सुटी असल्याने रेशन दुकानदारांच्या संपाची शासकीय पातळीवर फारशी दखल घेतली गेली नसली तरी, त्यानंतर मात्र सरकार खडबडून जागे झाले आहे. नागरी पुरवठा खात्याचे अप्पर सचिव विलास पाटील यांनी या संपाची दखल घेत रेशन दुकानदारांना पत्र पाठवून त्यांना धान्य वाटप करताना स्वत:च्या आधारकार्डाचा वापर करण्याचे व त्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा अंगठा न घेण्यास मुभा दिली आहे. तसेच रेशन दुकानादारांच्या काही मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असून, राज्य सरकारच्या अखत्यारितील मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याने कोविडची परिस्थिती पाहता संप न करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, रेशन दुकानदारांचे सरकारच्या आश्वासनांवर समाधान झालेले नसल्याने बुधवारी (दि.५) सलग पाचव्या दिवशीही शहर व जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेंतर्गंत मे व जून महिन्यात कार्डधारकांना मोफत अतिरिक्त धान्य वाटप करण्यात येणार असून, साधारणत: महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे वितरण सुरू होते. परंतु संपामुळे ते ठप्प झाले आहे.

चौकट===

शासनाने काही मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविलेली असली तरी, दुकानदारांचे समाधान झालेले नाही. संप मागे घेण्याबाबत सामूहिक निर्णय घेण्यात येईल परंतु शासनाने अजूनही दुकानदारांबाबत योग्य निर्णय घेऊन न्याय मिळवून द्यावा.

- निवृत्ती महाराज कापसे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

(फोटो आहे)