शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंचवटीतील रेशन दुकानदारांची मनमानी

By admin | Updated: January 16, 2015 00:11 IST

पंचवटीतील रेशन दुकानदारांची मनमानी

हनुमानवाडी : पंचवटीत हनुमानवाडी परिसरातील अनेक रेशन दुकानदार सोयीने दुकाने उघडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. शासनाने निर्धारित वेळा ठरवून दिल्यानंतरही दुकानदार दुकाने बंद ठेवत असल्याने नागरिकांना अकारण चकरा घालाव्या लागत आहे.हनुमानवाडी परिसरात सात शासनमान्य रेशन दुकाने आहेत; परंतु पंचवटीतील लोकांची संख्या बघता ही दुकाने कमीच आहे. यात क्रांतिनगर, मखलाबाद नाका व हनुमानवाडी परिसरात प्रत्येकी दोन, तर मधुबन कॉलनीत एक अशी सात दुकाने आहेत. दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ अशी आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही दुकाने वेळेवर उघडली जात नाही. परिणामी कामावर निघून जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा दुकान सुरू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी हेलपाटे घालावे लागतात. अनेक दुकानदार यासंदर्भात नीट उत्तरेही देत नाही, काही जण दुकानात काम करणारा कामगार वेळेत येत नसल्याचे सांगतात. कारणे काहीही असली तरी वेळेवर दुकाने सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे पुरवठा विभागाने यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. केवळ दुकानांच्या वेळेचाच प्रश्न नाही तर धान्याची उपलब्धता आणि दरांविषयीही तक्रारीही करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)