शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

रेशन धान्यामध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:09 IST

शासकीय धान्य गुदामातून वजन करून उचललेले धान्य जसेच्या तसे रेशन दुकानदारांकडे पोहोचते करताना ते मोजूनच देण्याचा दंडक शासनाने घातलेला असतानाही वाहतूक ठेकेदाराकडून मात्र त्याला हरताळ फासला जात आहे. शासन मोजून धान्य देत असताना प्रत्यक्षात दुकानदारांना वीस ते पंचवीस किलो धान्याचे कमी वाटप केले जात असून, अशा प्रकारातून शासकीय धान्याचा मोठा घोळ उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : शासकीय धान्य गुदामातून वजन करून उचललेले धान्य जसेच्या तसे रेशन दुकानदारांकडे पोहोचते करताना ते मोजूनच देण्याचा दंडक शासनाने घातलेला असतानाही वाहतूक ठेकेदाराकडून मात्र त्याला हरताळ फासला जात आहे. शासन मोजून धान्य देत असताना प्रत्यक्षात दुकानदारांना वीस ते पंचवीस किलो धान्याचे कमी वाटप केले जात असून, अशा प्रकारातून शासकीय धान्याचा मोठा घोळ उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या साºया प्रकाराबाबत पुरवठा खातेही अनभिज्ञ असून, दुकानदारांना कमी धान्य देऊनही ठेकेदार जुमानत नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न पडला आहे.  शासनाने शासकीय धान्याची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, सदर ठेकेदाराने अन्नधान्य महामंडळ अथवा शासकीय धान्य गुदामातून धान्याची उचल करताना धान्य मोजून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे वाहतुकीसाठी धान्य ताब्यात घेताना एक किलोही धान्य कमी न घेण्याचे वाहतूक ठेकेदाराला बंधनकारक आहे, त्याच प्रमाणे वाहतूक ठेकेदाराने सदरचे धान्य रेशन दुकानदाराला देताना त्याचे वजन करून देणेही तितकेच अपेक्षित आहे. दुकानदारांनीदेखील धान्य ताब्यात घेताना ते मंजूर धान्याच्या प्रमाणात योग्य आहे की नाही याची खात्री करूनच मालाची पोहोच वाहतूक ठेकेदाराला देणे गरजेचे आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाहतूक ठेकेदार धान्य पोहोचविणाºया ठेकेदाराकडून दुकानदारांना धान्य देताना एकूण मंजूर धान्याच्या तुलनेत कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात आहे. यापूर्वी धान्याची वाहतूक करताना गळती होत असल्याचे कारण दिले जात तसेच धान्याची चढ-उतार करणाºया हमालांकडे संशयाने पाहिले जात होते. रेशन दुकानदारांना दरमहा धान्य कमी मिळण्याचे प्रकार घडत होते, तेच टाळण्यासाठी शासनाने वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली असली तरी पूर्वीसारखाच धान्य कमी मिळण्याचे प्रमाण सुरू झाल्याची तक्रार रेशन दुकानदार करीत आहेत. या संदर्भात काही दुकानदारांनी ठेकेदाराला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार करा असा सल्लाच ठेकेदार देत असल्यामुळे धान्य कमी मिळण्यामागे अधिकाºयांचाही काही हात असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. काही दुकानदारांना कमी धान्य देऊनही ठेकेदार पुरेसे धान्य मिळाल्याच्या पोहोच पावतीवर स्वाक्षरी करून घेत आहे. काही दुकानदारांना धान्य कमी मिळाल्याचे, तर काहींना पुढच्या महिन्यात धान्य ‘अ‍ॅडजेस्ट’ करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे.साखरेच्या  नावे ठणाणाऐन दिवाळी सणात साखर पुरविण्यात अपयशी ठरलेल्या पुरवठा खाते व वाहतूक ठेकेदाराने दिवाळी आटोपल्यावरही अनेक दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला नसल्याची तक्रार दुकानदार करीत आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या दोन दिवस अगोदर सर्वच धान्य दुकानदारांना साखर देण्याचे पुरवठा खात्याने मान्य केले होते, परंतु प्रत्यक्षात अनेक दुकानदारांपर्यंत साखर पोहोचली नाही, त्यामुळे गोरगरिबांना दिवाळीत खुल्या बाजारातून साखर खरेदी करावी लागली.शेकडो क्विंटलचा प्रश्नएका दुकानदाराला पाच ते दहा किलो धान्य दरमहा कमी दिले जात असेल तर संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे २६०० दुकानांचा हिशेब केल्यास दरमहा शेकडो क्विंटल धान्य ठेकेदाराकडून गायब केले जात असल्याची शक्यता रेशन दुकानदारांनी केलेल्या तक्रारींवरून नाकारता येत नाही. या साºया प्रकारात दोन्ही बाजूंकडून सांभाळून घेण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कोणी उघडपणे बोलण्यास तयार होत नाही.