शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

२० हजार कार्डधारकांना रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:17 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धान्याच्या कोट्यात कपात करण्याऐवजी नवीन लाभार्थींना त्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सुमारे २० हजार पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध सुरू झाला आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धान्याच्या कोट्यात कपात करण्याऐवजी नवीन लाभार्थींना त्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सुमारे २० हजार पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध सुरू झाला आहे.  केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करून ग्रामीण भागात ३९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या तर शहरी भागात ६४ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला शिधापत्रिकेवर रेशनमधून दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी, शहरी भागात मात्र वार्षिक उत्पन्नाच्या निकषात शिधापत्रिकाधारकांना पात्र ठरविण्यासाठी पुरवठा खात्याला कसरत करावी लागली होती. मात्र केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्यावेळी अधिकाऱ्यांनी शिधापत्रिकाधारक पात्र ठरविले; परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात भेदाभेद झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या उद्दिष्टाइतकेच शिधापत्रिकाधारक पात्र ठरविण्याची सक्ती असल्याने एकाच ठिकाणी व समान वार्षिक उत्पन्न असलेल्या अनेकांना डावलले गेल्याने सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर सरकारने पुन्हा उद्दिष्ट वाढवून दिले असले तरी, त्यातून सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळू शकलेला  नाही.  आता मात्र एप्रिल महिन्यापासून सरकारने रेशनच्या धान्य वाटपासाठी पॉस यंत्राची सक्ती केल्याने जे रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी येतील त्यांनाच धान्य वितरित केले जात आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सुमारे २० ते २२ टक्के शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठीच आले नाहीत.वीस हजार लाभार्थी शक्यपुरवठा खात्याने तहसीलदारांना तशा सूचना दिल्या असून, मात्र या योजनेचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या अटीत बसणाºयांनाच यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे, तसे जिल्ह्यात २० हजार लाभार्थी असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय