शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘रसयात्रा’ नृत्याविष्कार रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:12 IST

‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़

ठळक मुद्देकीर्तीकला मंदिर : कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम

नाशिक : ‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि़ वा़ शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य साधनेला वाहिलेल्या संस्थेने काल एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रंगमंचावर तात्यांच्या कवितांवर आधारित नृत्याचा रसयात्रा हा अनोखा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली़कालिदास कलामंदिर, सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा तीन ठिकाणी एकाच वेळी रसयात्रा सादर झाली़ कालिदासमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक एज्युकेशनचे सूर्यकांत रहाळकर, श्रद्ध फाउंडेशनचे सुरेशअण्णा पाटील, महाराष्ट्र सेवा संघाचे साळी, बनकर सिक्युरिटीजचे बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ सायखेडकरमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे, सागरमल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, ज्येष्ठ विधिज्ञ नंदकिशोर भुतडा हे विशेष अतिथी होते़ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आशाताई टकले यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़चार दशकांनंतर आदिरेखा यांनी नव्या संचात काल सादर केलेल्या कार्यक्रमात ८८ सालची एक जोडी पुन्हा उतरवली होती़ कालिदासमध्ये सदानंद जोशी, सायखेडकरमध्ये आनंद प्रभू, प्रतिष्ठानमध्ये रेणुका येवलेकर यांनी सूत्रसंचालन केले़ शहरातील सर्व शाळा, कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनी आणि पालक यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले़कविराजांच्या अमृतमहोत्सवी वर्षात कीर्ती कलामंदिरच्या संस्थापिका रेखा नाडगौडा आणि कुमुद अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून रसयात्रेचा जन्म झाला़ बाळ भाटे यांची संगीतसाथ यात्रेला लाभली़ अपर्णा मयेकर, रंजना जोगळेकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, उत्तरा केळकर, अरुण इंगळे, त्यागराज खाडिलकर आदींनी या कविता त्यावेळी गायल्या होत्या़ खुद्द तात्यांनी या सादरीकरणास दाद दिली होती़ नंतर ८७ साली तात्यांना ज्ञानपीठ मिळाल्यावर हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला गेला़ त्यानंतरही रसयात्रेचे प्रयोग होत राहिले़ नवनव्या कलाकारांना रसयात्रेतील कविता मोहवित राहिल्या़

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक