शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

‘रसयात्रा’ नृत्याविष्कार रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:12 IST

‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़

ठळक मुद्देकीर्तीकला मंदिर : कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम

नाशिक : ‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली़ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि़ वा़ शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य साधनेला वाहिलेल्या संस्थेने काल एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रंगमंचावर तात्यांच्या कवितांवर आधारित नृत्याचा रसयात्रा हा अनोखा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली़कालिदास कलामंदिर, सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा तीन ठिकाणी एकाच वेळी रसयात्रा सादर झाली़ कालिदासमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक एज्युकेशनचे सूर्यकांत रहाळकर, श्रद्ध फाउंडेशनचे सुरेशअण्णा पाटील, महाराष्ट्र सेवा संघाचे साळी, बनकर सिक्युरिटीजचे बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ सायखेडकरमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे, सागरमल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, ज्येष्ठ विधिज्ञ नंदकिशोर भुतडा हे विशेष अतिथी होते़ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आशाताई टकले यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़चार दशकांनंतर आदिरेखा यांनी नव्या संचात काल सादर केलेल्या कार्यक्रमात ८८ सालची एक जोडी पुन्हा उतरवली होती़ कालिदासमध्ये सदानंद जोशी, सायखेडकरमध्ये आनंद प्रभू, प्रतिष्ठानमध्ये रेणुका येवलेकर यांनी सूत्रसंचालन केले़ शहरातील सर्व शाळा, कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनी आणि पालक यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले़कविराजांच्या अमृतमहोत्सवी वर्षात कीर्ती कलामंदिरच्या संस्थापिका रेखा नाडगौडा आणि कुमुद अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून रसयात्रेचा जन्म झाला़ बाळ भाटे यांची संगीतसाथ यात्रेला लाभली़ अपर्णा मयेकर, रंजना जोगळेकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, उत्तरा केळकर, अरुण इंगळे, त्यागराज खाडिलकर आदींनी या कविता त्यावेळी गायल्या होत्या़ खुद्द तात्यांनी या सादरीकरणास दाद दिली होती़ नंतर ८७ साली तात्यांना ज्ञानपीठ मिळाल्यावर हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला गेला़ त्यानंतरही रसयात्रेचे प्रयोग होत राहिले़ नवनव्या कलाकारांना रसयात्रेतील कविता मोहवित राहिल्या़

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक