शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:00 IST

वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देचार वर्षांपासून बंद झालेला टँकर पुन्हा सुरू करण्याची मागणी

वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे.या गावात सद्य:स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिला वर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावासाठी तत्काळ टँकर मंजूर केला जावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.चालू वर्षी तालुकाभरात कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना तळाला गेल्या असून, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी गावासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेची विहीर व इतर कूपनलिकांनी तळ गाठल्याने मोठे जलसंकट उभे ठाकले आहे. गावातील बहुतांश नागरिक शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला आपली रोजीरोटी बुडवून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजूर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे दहा वर्षांपासून सुरू टँकर बंद झाला होता.गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असून, या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहिरी आटल्यामुळे टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय नाही.टॅँकरसाठी प्रस्ताव सादरपाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षांपासून गावाला सुरू असलेले टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून, गावाला सद्य:स्थितीत पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षांपासून बंद झालेला टँकर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीने बागलाण पंचायत समितीकडे केली असून, तसा प्रस्ताव सादर केला आहे.