शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

वाचकांपर्यंत पोहचण्याची गरज रंगनाथ पठारे : पुस्तक पेठ दालनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:06 IST

पुस्तकांवर प्रेम करणारे वाचक महाराष्टÑात मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्यापर्यंत प्रकाशक, विक्रेते यांनी पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे.

ठळक मुद्देकुसुमाग्रज स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजनपुस्तकालय हे सांस्कृतिक केंद्र असले पाहिजेनव्या पिढीला वाचनसाक्षर करण्याचा कार्यक्रम

नाशिक : पुस्तकांवर प्रेम करणारे वाचक महाराष्टत मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्यापर्यंत प्रकाशक, विक्रेते यांनी पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे. पुस्तकांकडे माणूस येण्यापेक्षा माणसाकडे पुस्तके आली पाहिजेत, असे प्रतिपादन साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. ‘पुस्तक पेठ’च्या नाशिकमधील दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी (दि.१२) दुपारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, पुस्तकालय हे सांस्कृतिक केंद्र असले पाहिजे. तेथे वाचक आणि लेखक, प्रकाशक यांचा संवाद झाला पाहिजे. वाचकांच्या अपेक्षा समजल्या पाहिजे. या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे काम पुस्तक पेठेच्या पुणे शाखेत उत्कृष्टरीत्या केले जात असून, तीच प्रथा नाशिकमध्येही पहायला मिळणार आहे.अभिरुचीचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या दालनाद्वारे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम यांनी पाश्चात्त्यांच्या धर्तीवर हवा तितका वेळ शांत बसून पुस्तक वाचण्यास जागा, कॉफीसह इतर पेय देत पुस्तक दुकानाद्वारे होणारे आदरातिथ्य, त्यामुळे पुस्तक घ्यायचे नाही हे ठरवून आलेली व्यक्ती सहज करून जात असलेली पुस्तकांची खरेदी पाहता आपल्याकडेही अशी पुस्तकांची दुकाने शहराशहरात व्हायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. माधव वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले. संजय जोशी यांनी प्रास्ताविक केले. निखिल दाते यांनी आभार मानले. याप्रसंगी साहित्यिक, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.साक्षरता अभियान हा कार्यक्रम जसा राबविला गेला तसाच आता नव्या पिढीला वाचनसाक्षर करण्याचा कार्यक्रम राबविला गेला पाहिजे अन् ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ गायक पंडित विष्णू दिगंबर हे कुणाच्याही निमंत्रणाशिवाय भारतभर फिरून लोकांना गाणं ऐकवायचे. ते म्हणत, कानसेन तयार केल्याशिवाय गायनसेन कसे तयार होतील. त्याचप्रमाणे चांगली पुस्तके वाचण्यासाठी वाचक तयार केले पाहिजे. त्यांनी वाचनासाठी प्रेरित व्हावे, असे अनुकूल वातावरण त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे, असा आग्रही त्यांनी धरला.