शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

रानडे, आंबेडकर दोघेही श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ

By admin | Updated: October 26, 2016 23:11 IST

नरेंद्र जाधव : माणकेश्वर वाचनालयात व्याख्यान

निफाड : न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही देशाला समोर ठेवून जीवनभर आपले सामाजिक कार्य केले. भारताच्या इतिहासात त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन खासदार नरेंद्र जाधव यांनी केले.निफाड येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने आयोजित खासदार जाधव यांचे ‘न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, प्राचार्य हरिष आडके, प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ उपस्थित होते. खासदार जाधव पुढे म्हणाले की, न्या. रानडे यांचा कालखंड आधीचा त्यानंतरचा डॉ. आंबेडकर यांचा कालखंड होता. भारतीय समाजात डॉ. आंबेडकर दलितांचे, तर न्या. रानडे हे मवाळ मतवादी मानले गेले. या दोन्ही नेत्यांनी जे काही केले ते देशासाठीच केले. या दोन्हीही महान नेत्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता मिळायला हवी. डॉ. आंबेडकर यांचे योगदान किती मोठे होते. त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार हे सांगण्यासाठी मी देशभरात व्याख्याने देत असून,  मी एकूण १२५ व्याख्यान देशभरात देणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. न्या. रानडे सर्वकालीन थोर पुरुष होते. त्यांनी समाज सुधारण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्याकडे सचोटी आणि बुद्धिमत्ता होती. त्यांच्या सुधारणा आणि अर्थविषयक भूमिका बाबासाहेबांनी पुढे नेल्या. बाबासाहेब हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनीच को-आॅप. फेडरालिझम तसेच केंद्र आणि राज्याबाबतचा आर्थिक मुलाधार आपल्या प्रबंधात मांडला. केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राला देशातून मिळणारा महसूल त्याचे  केंद्र आणि राज्ये यांच्यात जे वाटप केले जात यातील आर्थिक सूचना ज्या पूर्वी रानडे यांनी सुचवलेल्या होत्या. यातील आर्थिक सूचनांचा विचार करून आंबेडकरांनी पुढे यासंदर्भात काम केले, असेही ते म्हणाले.  बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री असताना कामगारांच्या कामाचे तास बाराहुन आठ केले. तर महीलांना मँर्टिनीटी रजा देण्याचा निर्णय , एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चा प्रारंभ , देशात पहिला कौशल्य विकास कार्यक्र म आणि पहिला नदी जोड प्रकल्प हे सर्व निर्णय आंबेडकरांनी घेतले होते. बाबासाहेबानी सांगितले की राजकारणात अति व्यक्तिपुजा नकोय अन्यथा लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहित होते. न्या रानडे हे देशातील सर्वात महान थोरपुरु ष आहेत. महात्मा गांधी ,न्या रानडे , बॅरिस्टर जिना या तिघांपैकी थोर महान न्या रानडे हेच असल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. प्रामाणकिपणा ,बुद्धिमत्ता, समाज हिताच्या द्दष्टीने प्रेरित असणे, या तीनही गुणांच्या कसोटीचा विचार करता न्या. रानडे हेच थोर महान पुरु ष होते असे म्हटले तेव्हा आंबेडकर यांच्यावर टीका झाली होती.  समाजसुधारणेसाठी फार मोठे ध्येर्य दाखवावे लागते ते ध्येर्य रानडेंनी दाखवलं कारण समाजसुधारणा करण्यासाठी समाजाला आव्हान द्यावे लागते सामाजिक बहिष्कार ओढवून घ्यावा लागतो त्याला समाजात टाळलं जातं या सर्व बाबींना रानडे सामोरे गेले म्हणून न्या.रानडे हे थोर पुरु ष होते असही जाधव म्हणाले .. कार्यक्र माचे सुत्रसंचालन सुनिल कुमावत यांनी केले. राजेंद्र सोमवंशी यांनी आभार मानले.