शहरं
Join us  
Trending Stories
1
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
2
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 
3
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
4
ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली
5
त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?
6
दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
7
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
8
'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
9
पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!
10
Health Tips: ५१ व्या वर्षीही गौर गोपाल दास दिसतात फिट; काय असतो साधूंचा डाएट?
11
लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?
12
बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी
13
४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
14
अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार
15
'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक
16
अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...
17
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
18
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
19
भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला! 'या' देशांना टाकले मागे, तुम्हीही यादीत आहात का?
20
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा

रानडे, आंबेडकर दोघेही श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ

By admin | Updated: October 26, 2016 23:11 IST

नरेंद्र जाधव : माणकेश्वर वाचनालयात व्याख्यान

निफाड : न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही देशाला समोर ठेवून जीवनभर आपले सामाजिक कार्य केले. भारताच्या इतिहासात त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन खासदार नरेंद्र जाधव यांनी केले.निफाड येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने आयोजित खासदार जाधव यांचे ‘न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, प्राचार्य हरिष आडके, प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ उपस्थित होते. खासदार जाधव पुढे म्हणाले की, न्या. रानडे यांचा कालखंड आधीचा त्यानंतरचा डॉ. आंबेडकर यांचा कालखंड होता. भारतीय समाजात डॉ. आंबेडकर दलितांचे, तर न्या. रानडे हे मवाळ मतवादी मानले गेले. या दोन्ही नेत्यांनी जे काही केले ते देशासाठीच केले. या दोन्हीही महान नेत्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता मिळायला हवी. डॉ. आंबेडकर यांचे योगदान किती मोठे होते. त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार हे सांगण्यासाठी मी देशभरात व्याख्याने देत असून,  मी एकूण १२५ व्याख्यान देशभरात देणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. न्या. रानडे सर्वकालीन थोर पुरुष होते. त्यांनी समाज सुधारण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्याकडे सचोटी आणि बुद्धिमत्ता होती. त्यांच्या सुधारणा आणि अर्थविषयक भूमिका बाबासाहेबांनी पुढे नेल्या. बाबासाहेब हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनीच को-आॅप. फेडरालिझम तसेच केंद्र आणि राज्याबाबतचा आर्थिक मुलाधार आपल्या प्रबंधात मांडला. केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राला देशातून मिळणारा महसूल त्याचे  केंद्र आणि राज्ये यांच्यात जे वाटप केले जात यातील आर्थिक सूचना ज्या पूर्वी रानडे यांनी सुचवलेल्या होत्या. यातील आर्थिक सूचनांचा विचार करून आंबेडकरांनी पुढे यासंदर्भात काम केले, असेही ते म्हणाले.  बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री असताना कामगारांच्या कामाचे तास बाराहुन आठ केले. तर महीलांना मँर्टिनीटी रजा देण्याचा निर्णय , एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चा प्रारंभ , देशात पहिला कौशल्य विकास कार्यक्र म आणि पहिला नदी जोड प्रकल्प हे सर्व निर्णय आंबेडकरांनी घेतले होते. बाबासाहेबानी सांगितले की राजकारणात अति व्यक्तिपुजा नकोय अन्यथा लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहित होते. न्या रानडे हे देशातील सर्वात महान थोरपुरु ष आहेत. महात्मा गांधी ,न्या रानडे , बॅरिस्टर जिना या तिघांपैकी थोर महान न्या रानडे हेच असल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. प्रामाणकिपणा ,बुद्धिमत्ता, समाज हिताच्या द्दष्टीने प्रेरित असणे, या तीनही गुणांच्या कसोटीचा विचार करता न्या. रानडे हेच थोर महान पुरु ष होते असे म्हटले तेव्हा आंबेडकर यांच्यावर टीका झाली होती.  समाजसुधारणेसाठी फार मोठे ध्येर्य दाखवावे लागते ते ध्येर्य रानडेंनी दाखवलं कारण समाजसुधारणा करण्यासाठी समाजाला आव्हान द्यावे लागते सामाजिक बहिष्कार ओढवून घ्यावा लागतो त्याला समाजात टाळलं जातं या सर्व बाबींना रानडे सामोरे गेले म्हणून न्या.रानडे हे थोर पुरु ष होते असही जाधव म्हणाले .. कार्यक्र माचे सुत्रसंचालन सुनिल कुमावत यांनी केले. राजेंद्र सोमवंशी यांनी आभार मानले.