शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

रमजान पर्व : सधन मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतिशिल नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:53 IST

समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे

ठळक मुद्देधान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे गहू, तांदूळ खरेदी नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू

नाशिक : रमजान पर्व या पवित्र महिन्यात सधन मुस्लीमांवर धर्माने जकात व दानधर्म करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार शहरातील मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतीशिल नियोजनास प्रारंभ करण्यात आला आहे. धान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला आहे. शहरातील धान्य दुकानांवर मुस्लीमांची गर्दी दिसू लागली आहे.समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे. धर्माने सधन मुस्लीमांची साधी-सोपी व्याख्या केली आहे. ज्या व्यक्तीकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी असेल ती व्यक्ती सधन मानली गेली आहे. त्याने त्या वर्षी आपल्या एकूण संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे आहे. तसेच धान्यदान (फित्रा) आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार करणे बंधनकारक आहे. दरम्यान, यामागे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देश आहे.गहू, तांदूळ खरेदीची नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू झाले आहे. धान्य खरेदीकडून फित्रा वाटपाचे नियोजन केले जात आहे. एकूण संपत्तीच्या अडीच टक्क्यानुसार हिशोब जुळवून येणारी रक्कम ‘जकात’ म्हणून दान करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी पहिल्याच शुक्रवारी मशिदींमधून प्रवचनाद्वारे केले आहे.‘जकात-फित्रा’ कोणाला द्यावा?रमजान काळात दानधर्म करताना सर्वप्रथम ‘जकात-फित्रा’ आपल्या रक्ताच्या नात्यांमधील गोरगरीबांचा शोध घ्यावा त्यानंतर आपल्या संपुर्ण खानदानमध्ये गरीब नातवाईकांचा शोध घ्यावा, त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या भागात गरजूंचा शोध घ्यावा, तेथेही न आढळल्यास गाव, शहरामध्ये शोध घेऊन त्याच्यापर्यंत ‘जकात-फित्रा’ पोहचवावा, असे धर्माने म्हटले आहे. एकूणच चौकस व प्रामाणिकपणे हे कर्तव्य पार पाडावे, यासाठी रमजानच्या पुवार्धच निवडावा असे धर्मगुरू सांगतात.

टॅग्स :RamzanरमजानIslamइस्लामMuslimमुस्लीम