शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बसथांब्यांना रिक्षांचा गराडा

By admin | Updated: February 12, 2017 00:37 IST

रिक्षाचालकांची मुजोरी : वाहतूक पोलिसांचेच दुर्लक्ष

पंचवटी : रविवार कारंजा असो की शालिमार बसथांबा रिक्षाचालकांना काहीच फरक पडत नाही. बसथांबा असला तरी बस रस्त्यावर अन् रिक्षा बसथांब्यावर असेच काहीसे चित्र शहरातील मुख्य मार्गांवर दिसून येते. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांना आवर घालण्यापेक्षा वाहतूक पोलीस बसचालक व वाहकांनाच दमदाटी करत असल्याचा कटू अनुभव येत असल्याने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बससेवेचा कणा मोडत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी भिवंडी येथील रिक्षाचालकाच्या मारहाणीत बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुखरूपपणे वाहतूक करणाऱ्या वाहक व चालकांच्या समस्यांकडे ना एसटी प्रशासन लक्ष देते ना वाहतूक शाखा, मग आम्ही तरी का वाईटपणा घ्यायचा, आम्हीही कौटुंबिक असून, आमची कोणीतरी घरी वाट बघतंय, असे असताना शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक धमक्या देतात. मग, आम्हाला निमूटपणे ऐकून प्रवाशांची वाहतूक सुरू ठेवावी लागते, त्यातून भिवंडीसारखी एखादी घटना आमच्या बाबतीत न घडो एवढी तरी दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. अशा संतप्त प्रतिक्रिया काही बसचालक- वाहक यांनी व्यक्त केल्या. (वार्ताहर)