शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

मनन, चिंतन हेच परमकल्याणाचे साधन रामगिरी महाराज : कथा श्रवणात येवलेकर तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:41 IST

येवला : ज्याप्रमाणे गीतेमधून अर्जुनाला सांगताना लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भागवत कथेत अधिकारी व्यक्ती म्हणून राजा परीक्षिताला भागवताचा अधिकारी मानण्यात येते.

ठळक मुद्देसर्व मानव जातीचा उद्धार व्हावा हा व्यापक दृष्टिकोननारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता होती ती लोकहिताची

येवला : ज्याप्रमाणे गीतेमधून अर्जुनाला सांगताना लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भागवत कथेत अधिकारी व्यक्ती म्हणून राजा परीक्षिताला भागवताचा अधिकारी मानण्यात येते. कृष्ण अर्जुन या जोडीप्रमाणेच शुक मुनी आणि राजा परीक्षित आहेत. या जोडीला वैयक्तिक लाभासाठी भागवत कथा सांगितलेली नसून सर्व मानव जातीचा उद्धार व्हावा हा व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळेच भागवत कथा श्रवण हे परमपुरुषार्थ सिद्धीचे साधन बनले, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. पुरुषोत्तममासनिमित्त शहरातील विंचूर रोडवरील अयोध्यानगरी येथे अंबादास बनकर व परिवाराच्या वतीने श्रीमद्भागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळ्याचा आज दुसरा दिवस होता. याप्रसंगी रामगिरी महाराज बोलत होते. आज गुरु वारी सकाळी संजय महाराज धोंडगे यांचे कीर्तन झाले. यावेळी हजारो महिला व पुरुषांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी महंत रामगिरी म्हणाले की, नारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता होती ती लोकहिताची. प्रचंड शास्त्रनिर्मिती करूनही अपेक्षित लोककल्याणाची सिद्धी झालेली नसल्याने व्यासांना आत्मग्लानी आली होती. नारद-व्यास संवादाने व्यासांच्या आत्मग्लानीची निवृत्ती झाली. पण शुक-परीक्षित संवाद वरील दोन्ही संवादांपेक्षा विलक्षण आहे. शुकदेव निर्गुण भावामध्ये स्थित, निवृत्तिपरायण, आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ आहेत. राजा परीक्षित लौकिक-ऐहिकाच्या चिंतेने मुक्त असून, त्याच्या अंगी पूर्ण वैराग्य बाणले आहे. या जोडीला वैयक्तिक वा लोकहित असे काही साधायचे नव्हते. दोघेही भागवत परायण, भगवंतांच्या यशोगाथांकडे आकृष्ट झालेले आणि शुद्ध मनाने वर्णन-श्रवणामध्ये तल्लीन झालेले होते. मनुष्यासाठी परमात्मा विषयक वर्णन आणि श्रवण हे एकमात्र त्याच्या परम पुरुषार्थाच्या सिद्धीचे साधन आहे. आणि तसे पाहता संपूर्ण भागवतपुराण श्रवण हेच परम पुरुषार्थाचे साधन आहे. मनुष्याचे जीवन क्षण क्षण क्षीण होत आहे. आयुष्य किती झपाट्याने पुढे सरकते याचा पत्ताच लागत नाही. क्षणभंगुर जीवनात महानातील महान प्राप्तव्य प्राप्त करून घेणे शक्य आहे. भागवताचे श्रवण, मनन, चिंतन हेच जीवमात्रासाठी परम कल्याणाचे साधन आहे. निर्गुणनिष्ठ ऋषीमुनीही भगवंतांच्या गुणानुवादात रमताना दिसतात.