शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:10 IST

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे ...

ठळक मुद्देरामायणाचार्य रामराव महाराज ढोक

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा-पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र आहेत. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जात असल्याचे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सीताहरण कथेदरम्यान सांगितले.स्व. सुशीलाबाई शिरोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने कळवण येथील आनंद सागर बहुउद्देशीय संस्था, सुनील शिरोरे व परिवाराच्या वतीने रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून सांगितल्या जाणाºया श्रीरामकथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी सीताहरण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी शहरातील शिवाजीनगर येथील रामलीला मैदानावर गर्दी केली होती. श्रीराम कथेचे संयोजक कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोरे, विलास शिरोरे, नितीन शिरोरे यांनी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे स्वागत केले त्यानंतर रामजन्म कथा सोहळ्यास प्रारंभ झाला.राम काळात खर्या अर्थाने सामाजिक समरसता होती जातीपातीचे लवलेश ही कोणाच्या मनात नव्हता.अयोध्येतून राम वनवासात जातात तेव्हा शोकाकुल झालेली अयोध्या नगरी, राजा दशरथाची केविलवाणी अवस्था, श्रावण बाळाच्या आई वडीलांची आठवण, दशरथ राजाचा अंत्यविधी, शूर्पनखा वंश, सीता हारण,जटायू पक्षाची लढाई करु न स्त्री रक्षणाची जबाबदारीचे महत्व विशद करु न आपण तर मानव आहोत आपल्या देशातील माता बिहणीचे रक्षण करा त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी निर्मल करा हीच खरी भाऊबीज असेल असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.रामायण म्हणजे आदर्श जीवनप्रणाली आहे. पितृभक्ती कशी असावी, हे रामाकडे पाहून कळतं, त्याग कसा असावा हे भरतामध्ये पाहायला मिळतं. बंधुप्रेम कसं असावं हे लक्ष्मणाच्या रूपाने दिसून येतं. राम हा केवळ आदर्श पुत्र नव्हता तर तो आदर्श पती, भाऊ, शिष्य, मित्रही होता. इतकंच नाही तर तो आदर्श शत्रूही होता. रामाच्या इतर गुणांच्या खूप कथा ऐकायला मिळतात. मात्र शत्रूचाही रामावर विश्वास होता. रामायणात आपण नेहमी ऐकलेल्या कथांपेक्षा रामायणातील अनेक विलक्षण प्रसंग आणि त्यातील तत्त्वज्ञानाची उकल ढोक महाराज मोठ्या खुबीने करतात.