शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:10 IST

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे ...

ठळक मुद्देरामायणाचार्य रामराव महाराज ढोक

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा-पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र आहेत. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जात असल्याचे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सीताहरण कथेदरम्यान सांगितले.स्व. सुशीलाबाई शिरोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने कळवण येथील आनंद सागर बहुउद्देशीय संस्था, सुनील शिरोरे व परिवाराच्या वतीने रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून सांगितल्या जाणाºया श्रीरामकथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी सीताहरण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी शहरातील शिवाजीनगर येथील रामलीला मैदानावर गर्दी केली होती. श्रीराम कथेचे संयोजक कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोरे, विलास शिरोरे, नितीन शिरोरे यांनी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे स्वागत केले त्यानंतर रामजन्म कथा सोहळ्यास प्रारंभ झाला.राम काळात खर्या अर्थाने सामाजिक समरसता होती जातीपातीचे लवलेश ही कोणाच्या मनात नव्हता.अयोध्येतून राम वनवासात जातात तेव्हा शोकाकुल झालेली अयोध्या नगरी, राजा दशरथाची केविलवाणी अवस्था, श्रावण बाळाच्या आई वडीलांची आठवण, दशरथ राजाचा अंत्यविधी, शूर्पनखा वंश, सीता हारण,जटायू पक्षाची लढाई करु न स्त्री रक्षणाची जबाबदारीचे महत्व विशद करु न आपण तर मानव आहोत आपल्या देशातील माता बिहणीचे रक्षण करा त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी निर्मल करा हीच खरी भाऊबीज असेल असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.रामायण म्हणजे आदर्श जीवनप्रणाली आहे. पितृभक्ती कशी असावी, हे रामाकडे पाहून कळतं, त्याग कसा असावा हे भरतामध्ये पाहायला मिळतं. बंधुप्रेम कसं असावं हे लक्ष्मणाच्या रूपाने दिसून येतं. राम हा केवळ आदर्श पुत्र नव्हता तर तो आदर्श पती, भाऊ, शिष्य, मित्रही होता. इतकंच नाही तर तो आदर्श शत्रूही होता. रामाच्या इतर गुणांच्या खूप कथा ऐकायला मिळतात. मात्र शत्रूचाही रामावर विश्वास होता. रामायणात आपण नेहमी ऐकलेल्या कथांपेक्षा रामायणातील अनेक विलक्षण प्रसंग आणि त्यातील तत्त्वज्ञानाची उकल ढोक महाराज मोठ्या खुबीने करतात.