शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:11 IST

पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही.

नाशिक : पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. तर काहींच्या माहेरच्या घराचे बरेच नुकसान झाल्याने तिथे अजूनही घरांची साफसफाई आणि डागडुजीच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला तिकडे जाणेच शक्य न झाल्याने नेहमीप्रमाणे रक्षाबंधनाला भावाला राखी बांधता येणार नसल्याची खंत नाशिकच्या अनेक भगिनींना वाटत आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिघात आलेल्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक घरांची वाताहत तर कुणाच्या घरांची पडझड झाली. त्याशिवाय आॅगस्टच्या प्रारंभापासून त्या भागात वाहने जाणेच ठप्प झाले. तसेच टपाल खात्याने पाठवलेले पत्र, कुरिअरमार्फत पाठवलेल्या राख्यादेखील पोहोचू शकल्या नसल्याचे नाशिकमधील भगिनींनी सांगितले. त्यामुळे यंदा आम्ही केवळ मोबाइलवर बोलूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करणार असल्याची भावनादेखील कोल्हापूर किंवा सांगलीत माहेर आणि नाशिकला सासर किंवा कुटुंबासह निवास करीत असलेल्या भगिनींनी बोलून दाखवली.दरवर्षी रक्षाबंधनाला मी माहेरी जाऊन सण साजरा करते. मात्र, यंदा पुराच्या घटनेमुळे रक्षाबंधनाला माहेरी जाऊन भावाला राखी बांधता आली नाही. तसेच आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह सगळ्यांनी मिळून सण साजरा करण्याच्या आनंदालादेखील मुकले आहे. त्यांना पाठवलेली राखीदेखील पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी भावाशी मोबाइलवर बोलूनच यंदाच्या रक्षाबंधनात समाधान मानावे लागेल.- अनुराधा किरण जाधव,  कडेगावमी मूळची सांगलीची असले तरी आमचे घर पुराच्या टप्प्यापासून थोडेसे दूर होते. त्यामुळे मीच आठवडाभर सांगलीत राहून माझ्या माहेरच्या घरातून पूरग्रस्तांची सेवा केली. त्यांना आमच्या युवा मंचच्या वतीने धान्य, जेवण, कपडे पुरवण्याचे कार्य करीत होते. मात्र, आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तिकडेच राहिल्याने परवाच नाशिकला परतले. मला सख्खा भाऊ नाही. पण दरवर्षी गावातील अन्य भावांना राखी बांधते. ते यंदा शक्य नसल्याची खंत आहे.- सोनिया होळकर, सांगलीमनाची प्रचंड घालमेल सुरू आहे. अथक प्रयत्नांनंतर माझी राखी एका कुरियर कंपनीने पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, मात्र ती राखी रक्षाबंधनाला भावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचेही सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा कोल्हापूरस्थित भावाला राखी मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा होईल. आम्हा दोघी बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ आहे, मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला दोघींची राखी पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे फोनवरच भावाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहे.- पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त नाशिकपोलीस दलात असल्यामुळे मी यापूर्वी कुरियरनेच सांगलीस्थित भावाकडे राखी पाठवत असायचे. यावर्षी पूरपरिस्थितीमुळे तो पर्यायही बंद झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण हतबल आहोत, त्यामुळे भावनांना आवर घालत भावाला फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधावा लागणार आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते मानले जाते. त्यामुळे मनात कुठेतरी सल जाणवत आहे.- शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणमी मागील २८ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. दरवर्षी भावाला कुरियरद्वारे राखी पाठवत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये राहणाºया भावाकडे राखी पाठविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावताना भावनांना आवर घालण्याचा धडा मिळालेला आहे. कोल्हापूरस्थित माझ्या काही मैत्रिणींशी मी संपर्क साधला असून, त्या माझ्या वतीने राखी खरेदी करून भावापर्यंत पोहोचविणार आहे.- नम्रता देसाई,पोलीस निरीक्षक, नाशिक

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनfloodपूर