शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:11 IST

पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही.

नाशिक : पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. तर काहींच्या माहेरच्या घराचे बरेच नुकसान झाल्याने तिथे अजूनही घरांची साफसफाई आणि डागडुजीच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला तिकडे जाणेच शक्य न झाल्याने नेहमीप्रमाणे रक्षाबंधनाला भावाला राखी बांधता येणार नसल्याची खंत नाशिकच्या अनेक भगिनींना वाटत आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिघात आलेल्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक घरांची वाताहत तर कुणाच्या घरांची पडझड झाली. त्याशिवाय आॅगस्टच्या प्रारंभापासून त्या भागात वाहने जाणेच ठप्प झाले. तसेच टपाल खात्याने पाठवलेले पत्र, कुरिअरमार्फत पाठवलेल्या राख्यादेखील पोहोचू शकल्या नसल्याचे नाशिकमधील भगिनींनी सांगितले. त्यामुळे यंदा आम्ही केवळ मोबाइलवर बोलूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करणार असल्याची भावनादेखील कोल्हापूर किंवा सांगलीत माहेर आणि नाशिकला सासर किंवा कुटुंबासह निवास करीत असलेल्या भगिनींनी बोलून दाखवली.दरवर्षी रक्षाबंधनाला मी माहेरी जाऊन सण साजरा करते. मात्र, यंदा पुराच्या घटनेमुळे रक्षाबंधनाला माहेरी जाऊन भावाला राखी बांधता आली नाही. तसेच आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह सगळ्यांनी मिळून सण साजरा करण्याच्या आनंदालादेखील मुकले आहे. त्यांना पाठवलेली राखीदेखील पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी भावाशी मोबाइलवर बोलूनच यंदाच्या रक्षाबंधनात समाधान मानावे लागेल.- अनुराधा किरण जाधव,  कडेगावमी मूळची सांगलीची असले तरी आमचे घर पुराच्या टप्प्यापासून थोडेसे दूर होते. त्यामुळे मीच आठवडाभर सांगलीत राहून माझ्या माहेरच्या घरातून पूरग्रस्तांची सेवा केली. त्यांना आमच्या युवा मंचच्या वतीने धान्य, जेवण, कपडे पुरवण्याचे कार्य करीत होते. मात्र, आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तिकडेच राहिल्याने परवाच नाशिकला परतले. मला सख्खा भाऊ नाही. पण दरवर्षी गावातील अन्य भावांना राखी बांधते. ते यंदा शक्य नसल्याची खंत आहे.- सोनिया होळकर, सांगलीमनाची प्रचंड घालमेल सुरू आहे. अथक प्रयत्नांनंतर माझी राखी एका कुरियर कंपनीने पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, मात्र ती राखी रक्षाबंधनाला भावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचेही सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा कोल्हापूरस्थित भावाला राखी मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा होईल. आम्हा दोघी बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ आहे, मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला दोघींची राखी पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे फोनवरच भावाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहे.- पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त नाशिकपोलीस दलात असल्यामुळे मी यापूर्वी कुरियरनेच सांगलीस्थित भावाकडे राखी पाठवत असायचे. यावर्षी पूरपरिस्थितीमुळे तो पर्यायही बंद झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण हतबल आहोत, त्यामुळे भावनांना आवर घालत भावाला फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधावा लागणार आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते मानले जाते. त्यामुळे मनात कुठेतरी सल जाणवत आहे.- शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणमी मागील २८ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. दरवर्षी भावाला कुरियरद्वारे राखी पाठवत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये राहणाºया भावाकडे राखी पाठविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावताना भावनांना आवर घालण्याचा धडा मिळालेला आहे. कोल्हापूरस्थित माझ्या काही मैत्रिणींशी मी संपर्क साधला असून, त्या माझ्या वतीने राखी खरेदी करून भावापर्यंत पोहोचविणार आहे.- नम्रता देसाई,पोलीस निरीक्षक, नाशिक

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनfloodपूर