नाशिक : अर्धांगवायू, पक्षाघात व मेंदूच्या विकारातून अपंगत्व आलेल्या रुग्णांना आजारपणाचा सामना करत पूर्णपणे परावलंबी जीवन जगावे लागते. अशा रुग्णांच्या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी ‘डॉ. राजुल वासा फाउंडेशन’ संस्था आधार देत आहे. फिजिओथेरपीने तीव्रता कमी करता येणे शक्य असल्याचे मत संस्थेचे डॉ. राजुल वासा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सातपूर येथे संस्थेच्या वतीने रविवार (दि.२१) पासून कायमस्वरूपी मोफत फिजिओथेरपी केंद्र सुरू केले जाणार आहे, असे वासा यांनी याप्रसंगी जाहीर केले आहेमेंदूचा पक्षाघात, अर्धांगवायू यांसारख्या आजारांमुळे रुग्णाच्या शरीराला कायमचे अपंगत्व येते. विकारानुसार अपंगत्वाच्या प्रमाणाची तीव्रता कमी किंवा जास्त असू शकते. दुर्दैवाने यांसारख्या असाध्य रोगांवर कुठलाही खात्रीशीर औषधोपचार उपलब्ध नसल्याचे त्या म्हणाल्या. राज्यासह देशात या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या आजारांची तीव्रता फिजिओथेरपी व रुग्णांचा नियमित व्यायाम करून घेतल्याने कमी होऊ शक ते, असे वासा यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी सभागृह नेते सलीम शेख, फाउंडेशनचे दिनकर गांगल, विवेक सहस्त्रबुद्धे, अपर्णा राठी उपस्थित होते.येथे चालेल केंद्रवासा यांच्याक डून प्रशिक्षण घेतलेले थेरपिस्ट या केंद्रावर रुग्णांना उपचार देणार असून, त्याचे चित्रीकरण करण्यात येऊन चित्रफितीसह संपूर्ण अहवाल डॉ. वासा यांच्याकडे पाठविला जाणार आहे. तसेच दर महिन्याला वासा या स्वत: केंद्राला भेट देऊन नवीन व जुने रुग्ण तपासणार आहेत. या संस्थेला भारत विकास परिषद व ‘सक्षम’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य लाभत आहे. (प्रतिनिधी)
राजुल वासा फाउंडेशन : सातपूरला सुरू होणार मोफत उपचार केंद्र
By admin | Updated: June 8, 2015 00:16 IST