शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नाराजांना ‘राज’चा धक्का

By admin | Updated: November 4, 2014 23:53 IST

राजीनामे मंजूर : मनसेला खिंडार

नाशिक : कौटुंबिक व वैयक्तिक कारणावरून पक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या नाराजांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच धक्का दिला असून, ज्यांनी ज्यांनी राजीनामे पाठविले अशा सर्वांचे राजीनामे मंजूर करीत असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यातून पक्षाला खिंडार पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. माजी आमदार प्रवीण दरेकर यांनीही पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा गेल्या आठवड्यात सादर केल्यानंतर त्यापाठोपाठ नाशकातून माजी आमदार व सरचिटणीस वसंत गिते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, प्रकाश दायमा यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे पदांचे राजीनामे पाठवून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.राजीनामा देण्यामागे या सर्वांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणे दिल्यामुळे सदरचे राजीनामे नाराजीतूनच दिले गेल्याचा सरळ सरळ अर्थ काढण्यात येत होता. त्यामागे पक्षावर दबावतंत्र वापरण्याचा हेतूही संबंधितांचा असण्याची शक्यता नाकारली जात नव्हती. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. अखेर राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून राजीनामा पाठवून पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करीत असल्याचे म्हटले आहे. अशावेळी कोण आपल्या पाठीशी उभे आहे हे कळण्यास मदत होईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्यामुळे नजीकच्या काळात राज ठाकरे यांची वक्रदृष्टी आपल्याकडे वळवून घेण्यास कोणी धजावणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यातही ज्यांनी पदाचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले, ते स्वीकारले गेल्याने आता मनसेला खिंडार पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.