शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची पुन्हा हजेरी

By admin | Updated: August 6, 2016 01:27 IST

पावसाची पुन्हा हजेरी

नाशिक : गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी नाशिकसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसभर आपली हजेरी कायम ठेवून पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले. येत्या चोवीस तासांत उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांतून थांबविलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्यामुळे मंगळवारच्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी चांगलाच अवधी मिळाला. जनजीवन सुरळीत होत असतानाच शुक्रवारी सकाळपासून पुन्हा श्रावणसरींनी हजेरी लावली. सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे नोकरी, धंद्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर मुलांनाही पावसापासून बचाव करीत शाळा गाठावी लागली. त्यानंतर दिवसभर पाऊस कायम राहिला. नाशिक शहरात शुक्रवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली असली तरी, पाच वाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला, रात्री उशिरापर्यंत हा जोर कमी अधिक होता. जिल्ह्णातही पावसाने हजेरी कायम ठेवली. सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत १९२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी रात्रीनंतर कमी करण्यात आलेला धरणातील विसर्ग पुन्हा सायंकाळी पाच वाजेनंतर पाटबंधारे खात्याने वाढविला. येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणातील विसर्गपावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीत १२९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता; मात्र सायंकाळी पाच वाजेनंतर धरणक्षेत्रातील पावसाचा जोर पाहता तो ६१६९ क्युसेकने वाढविण्यात आला. जिल्ह्णातील अन्य धरणांतून सायंकाळी पाच वाजता करण्यात आलेला विसर्ग पुढील प्रमाणे-भावली-८७२, पालखेड-६००६, करंजवण-१०००, वाघाड-१७३०, पुणेगाव-५७३, दारणा-१५४१२, भावली-४८१, वालदेवी-१०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दक्षतेचे आदेशहवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या चोवीस तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात १२४ ते २४४ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी,नाल्याकाठच्या गावांना सावधानतेचे आदेश देण्यात आले आहेत.