शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

By admin | Updated: October 16, 2015 22:11 IST

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

नाशिक : खरीप हंगामात अपेक्षित हजेरी न लावलेल्या पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, तर काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या जळून गेल्या होत्या. या लहरी पर्जन्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता असून, मागील वर्षाच्या तुलनेत रब्बीचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १० ते १५ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र कमी कमी होत चालल्याचे सरासरी लागवडीच्या आकडेवारीवरून दिसते. सन २०१३-१४ या वर्षात रब्बी हंगामासाठी एकूण सरासरी लागवडीचे क्षेत्र १ लाख ३२ हजार ७०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. तीच बाब सन २०१४-१५ वर्षात रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र १ लाख ६५ हजार ९०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. आताही या वर्षात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामाचे सरासरी लागवडीचे १ लाख ४५ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर लागवड होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तर पावसानेही दडी मारल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर व पिकांच्या क्षेत्रावर होणार आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू व हरभरा हीच प्रमुख पिके आहेत. कमी पावसाने दोन्ही पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)