शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

By admin | Updated: October 16, 2015 22:11 IST

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

नाशिक : खरीप हंगामात अपेक्षित हजेरी न लावलेल्या पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, तर काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या जळून गेल्या होत्या. या लहरी पर्जन्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता असून, मागील वर्षाच्या तुलनेत रब्बीचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १० ते १५ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र कमी कमी होत चालल्याचे सरासरी लागवडीच्या आकडेवारीवरून दिसते. सन २०१३-१४ या वर्षात रब्बी हंगामासाठी एकूण सरासरी लागवडीचे क्षेत्र १ लाख ३२ हजार ७०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. तीच बाब सन २०१४-१५ वर्षात रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र १ लाख ६५ हजार ९०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. आताही या वर्षात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामाचे सरासरी लागवडीचे १ लाख ४५ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर लागवड होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तर पावसानेही दडी मारल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर व पिकांच्या क्षेत्रावर होणार आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू व हरभरा हीच प्रमुख पिके आहेत. कमी पावसाने दोन्ही पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)