शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

By admin | Updated: August 12, 2016 00:53 IST

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

मोठा दिलासा : यंदा टंचाईपासून मुक्ततानाशिक : जुलैच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण केल्याने शासन-प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात हजेरी ठेवून असलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या ७९ टक्के इतकी नोंद केली, तर सलग सुरू असलेल्या पावसाने यंदा पहिल्यांदाच आॅगस्टमध्येच जिल्ह्यातील धरणे ७७ टक्केभरली आहेत. तसे पाहिले तर जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २३ प्रकल्पांची (धरण) साठवण क्षमता ६५, ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, सध्या त्यात ५०,५२२ दशलक्ष घनफूट इतका म्हणजेच ७७ टक्के साठा आहे, परंतु गेल्या दहा दिवसांपासून गंगापूरसह १९ धरणांमधून दरररोज हजारो क्यूसेक पाणी सोडले जात आहे, याच पाण्याची साठवणूक केली असते तर धरणे शंभर टक्केभरल्याचे चित्र होते. मात्र धरणांच्या क्षमतेच्या काही प्रमाणातच त्यात पाणी साठवण्याची तरतूद असल्यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत धरणांमधून विसर्ग सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याचा तसेच पाझर तलावे, साठवण बंधारे, कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्यास मदत होणार आहे. या शिवाय सिंचन क्षेत्रासाठी हेच पाणी उपयोगी पडणार असून, दरवर्षी साधारणत: डिसेंबरपासून भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असा आशावाद आहे. धरणांत साठलेल्या पाण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यात केले जाणार असून, त्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आरक्षण ठेवून उर्वरित पाणी अन्य जिल्ह्णांना सोडले जाणार आहे, त्यामुळे किमान जिल्ह्णाची पुढील आठ महिन्यांच्या गरजेइतके पाणी मिळण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)