शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

By admin | Updated: August 12, 2016 00:53 IST

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

मोठा दिलासा : यंदा टंचाईपासून मुक्ततानाशिक : जुलैच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण केल्याने शासन-प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात हजेरी ठेवून असलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या ७९ टक्के इतकी नोंद केली, तर सलग सुरू असलेल्या पावसाने यंदा पहिल्यांदाच आॅगस्टमध्येच जिल्ह्यातील धरणे ७७ टक्केभरली आहेत. तसे पाहिले तर जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २३ प्रकल्पांची (धरण) साठवण क्षमता ६५, ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, सध्या त्यात ५०,५२२ दशलक्ष घनफूट इतका म्हणजेच ७७ टक्के साठा आहे, परंतु गेल्या दहा दिवसांपासून गंगापूरसह १९ धरणांमधून दरररोज हजारो क्यूसेक पाणी सोडले जात आहे, याच पाण्याची साठवणूक केली असते तर धरणे शंभर टक्केभरल्याचे चित्र होते. मात्र धरणांच्या क्षमतेच्या काही प्रमाणातच त्यात पाणी साठवण्याची तरतूद असल्यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत धरणांमधून विसर्ग सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याचा तसेच पाझर तलावे, साठवण बंधारे, कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्यास मदत होणार आहे. या शिवाय सिंचन क्षेत्रासाठी हेच पाणी उपयोगी पडणार असून, दरवर्षी साधारणत: डिसेंबरपासून भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असा आशावाद आहे. धरणांत साठलेल्या पाण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यात केले जाणार असून, त्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आरक्षण ठेवून उर्वरित पाणी अन्य जिल्ह्णांना सोडले जाणार आहे, त्यामुळे किमान जिल्ह्णाची पुढील आठ महिन्यांच्या गरजेइतके पाणी मिळण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)