शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

By admin | Updated: August 3, 2014 02:04 IST

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

 

कळवण : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाडे- वस्त्यांचा संपर्क तुटला असून, परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली. दरम्यान, शिंगाशीला अनोळखी युवकाचे शव आढळून आले आहे.सप्तशृंग गडावर झालेल्या मुसळधार पावसाने बेहडी नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे मानूर गावाजवळ कोल्हापूर फाट्यानजीक बंधाऱ्याचा भराव खचल्याने शशिकांत अहेर यांच्या मक्याच्या शेतीमध्ये पाणी घुसले. यात मक्याचे चार एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच मानूर येथेच बेहडी नदीकाठावरील मनोहर पवार यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतात खड्डे निर्माण झाले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तलाठी एम. एस. कापडणीस यांनी पंचनामा केला आहे. शहरात असलेल्या भवानी कॉम्प्लेक्स बिल्ंिडगची संरक्षक भिंत पावसामुळे पडली असून, या ठिकाणी असलेल्या वीजरोहित्राची माती खचल्यामुळे तिरपी झाली आहे. तालुक्यातील जांभाळ व महाल भागातील रस्ते उखडून गेले आहे. कळवण ते सुरगाणा तालुक्यांचा संपर्क तुटला असून, मांगलीदर, वीरशेत, राठीआंबा, जिरवाडे, धनोली, शृंगारवाडी आदि १२ ते १३ खेड्यांवरील २५० आदिवासी विद्यार्थी दळवट गावापर्यंत पायपीट करून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दळवट ते शृंगारवाडीपर्यंत असलेल्या नदीनाल्यावरील पुलाची बांधकामे पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यंत्रणा या भागापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.भाताची लागवड बंदगेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील भात लागवडीचे काम ठप्प झाले आहे. भाताची रोपे तयार झाली असून, पावसाने उघडीप न दिल्याने यावर्षी भात लागवड सुरुवात झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी सांगितले. पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिंगाशी येथे तांबडी नदीपात्रात एक युवकाचे शव आढळून आले. त्याची ओळख पटली नसून अभोणा पोलिसांत अज्ञात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)