शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

By admin | Updated: August 3, 2014 02:04 IST

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

 

कळवण : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाडे- वस्त्यांचा संपर्क तुटला असून, परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली. दरम्यान, शिंगाशीला अनोळखी युवकाचे शव आढळून आले आहे.सप्तशृंग गडावर झालेल्या मुसळधार पावसाने बेहडी नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे मानूर गावाजवळ कोल्हापूर फाट्यानजीक बंधाऱ्याचा भराव खचल्याने शशिकांत अहेर यांच्या मक्याच्या शेतीमध्ये पाणी घुसले. यात मक्याचे चार एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच मानूर येथेच बेहडी नदीकाठावरील मनोहर पवार यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतात खड्डे निर्माण झाले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तलाठी एम. एस. कापडणीस यांनी पंचनामा केला आहे. शहरात असलेल्या भवानी कॉम्प्लेक्स बिल्ंिडगची संरक्षक भिंत पावसामुळे पडली असून, या ठिकाणी असलेल्या वीजरोहित्राची माती खचल्यामुळे तिरपी झाली आहे. तालुक्यातील जांभाळ व महाल भागातील रस्ते उखडून गेले आहे. कळवण ते सुरगाणा तालुक्यांचा संपर्क तुटला असून, मांगलीदर, वीरशेत, राठीआंबा, जिरवाडे, धनोली, शृंगारवाडी आदि १२ ते १३ खेड्यांवरील २५० आदिवासी विद्यार्थी दळवट गावापर्यंत पायपीट करून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दळवट ते शृंगारवाडीपर्यंत असलेल्या नदीनाल्यावरील पुलाची बांधकामे पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यंत्रणा या भागापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.भाताची लागवड बंदगेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील भात लागवडीचे काम ठप्प झाले आहे. भाताची रोपे तयार झाली असून, पावसाने उघडीप न दिल्याने यावर्षी भात लागवड सुरुवात झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी सांगितले. पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिंगाशी येथे तांबडी नदीपात्रात एक युवकाचे शव आढळून आले. त्याची ओळख पटली नसून अभोणा पोलिसांत अज्ञात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)